vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी तयार करा, अन्यथा शासकीय योजनांचा लाभ मिळणार -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी तयार करा, अन्यथा शासकीय योजनांचा लाभ मिळणार -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ जलद व पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेअंतर्गत प्रशासनाकडून शेतकरी माहिती संच तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा ‘शेतकरी ओळख क्रमांक’ (फार्मर आयडी) तयार केला जात असून, तो नसल्यास शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी तात्काळ तयार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे..बुलढाणा जिल्ह्यात अग्रीस्टॅक प्रकल्पाची अंमलबजावणी दि. 1डिसेंबर 2024 पासून कॅम्प मोडमध्ये, तसेच 21 जानेवारी 2025 पासून नागरी सुविधा केंद्र व कॅम्प या हायब्रिड पद्धतीने सुरू आहे. या मोहिमेत आजअखेर 3,58,674 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार करण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील पी.एम. किसान योजनेचे एकूण 4,34,468 लाभार्थी आहेत. त्यापैकी फक्त 2,94,339 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले असून, उर्वरित 1,40,129 शेतकऱ्यांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही. या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावा, अन्यथा ‘पी.एम. किसान’, ‘पिक विमा’, ‘पिक कर्ज’, ‘पिक अनुदान’ आदी योजनांचा लाभ मिळणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

फार्मर आयडीसाठी आवश्यक कागदपत्रे:आधार कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, सातबारा उतारा / गाव नमुना 8 असर्व संयुक्त व समाईक खातेदारांनी प्रत्येक सहधारकाचा स्वतंत्र फार्मर आयडी तयार करणे आवश्यक आहे. तसेच एकदा फार्मर आयडी तयार झाल्यानंतर वारंवार ई-केवायसीची गरज भासत नाही. यासाठी आपला सातबारा उतारा आधार कार्डाशी लिंक करून नजीकच्या नागरी सुविधा केंद्र (सीएससी) येथे जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

शेती उत्पादन वाढ, शेतमाल निर्यातीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयुक्त- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- कृषि विभागाच्या शेतकरी परिसंवादात प्रतिपादन- शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचे आवाहन

शेलूद येथे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची 31 वी सभा संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हदगाव येथील पुरातन श्रीकृष्णदेव उखळाई मंदिर नवपर्व व कलशारोहण सोहळा

vishwatmaklokswamivarta

भिवंडी मध्ये हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू…

vishwatmaklokswamivarta

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून सणसर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी पूरग्रस्त भागातील नागरिकांशी साधला संवाद; सणसर येथील ओढ्याचे खोलीकरण करण्याचे दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta