vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची न भरून येणारी हानी – उपसभापती सचिन अहिर

ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची न भरून येणारी हानी – उपसभापती सचिन अहिर

मुंबई , द प्रतिनिधी: ज्येष्ठ मराठी साहित्यिक, संपादक व अभ्यासक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

 

अनाथ विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत अत्यंत संघर्षमय वातावरणात घडलेल्या श्रीनिवास कुलकर्णी यांचे मराठी साहित्यातील योगदान चिरंतन टिकणारे आहे. ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’ आणि ‘कोरडी भिक्षा’ यांसारख्या अजरामर साहित्यकृती तसेच मौज प्रकाशनाचे संपादक म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी कायम स्मरणात राहील. त्यांना राज्य शासनाच्या मानाच्या ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

 

त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असून, ईश्वर त्यांच्या सर्व वाचक, अभ्यासक व आप्तजनांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना उपसभापती सचिन अहिर यांनी केली आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर येथे २२०/३३ केव्ही उच्चदाब वीज उपकेंद्राचे भूमिपूजन

पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले; मुंबईतील मुलुंड रेल्वे स्टेशनवर गंभीर प्रकार

आज 19 ऑगस्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी…

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा

महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा प्रेरणास्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

कृषी यांत्रिकीकरणातून शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्रीचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर जिल्ह्यात १००० अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण; कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ

vishwatmaklokswamivarta