vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यात “धरती आभा” अभियानांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये बँकांमार्फत वित्तीय साक्षरता शिबिरांचे आयोजन

ठाणे जिल्ह्यात “धरती आभा” अभियानांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये बँकांमार्फत वित्तीय साक्षरता शिबिरांचे आयोजन

ठाणे, प्रतिनिधी- ठाणे जिल्हा प्रशासनाच्या “धरती आभा” अभियानांतर्गत आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांसाठी वित्तीय साक्षरता शिबिरे आयोजित करण्यात आली. ही शिबिरे राहूर, मेंडे, मोहप, दहिवली, नेवाडे इत्यादी विविध ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये पार पडली. ३० जून पर्यंत विविध ग्रामपंचायतीमध्ये ही शिबिरे घेतली जातील.

  या शिबिरांमध्ये आदिवासी समाजातील नागरिकांना बँकिंग सेवा, बचत खात्याचे महत्त्व, डिजिटल व्यवहार, तसेच सरकारी सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती देण्यात आली. विशेषतः खालील उपक्रम राबविण्यात आले…..• नव्याने बचत खाती उघडली गेली(प्रधानमंत्री जनधन योजनेत)• प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) मध्ये नोंदणी• प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) मध्ये नोंदणी  बँकांचे प्रतिनिधी आणि आर्थिक साक्षरता सल्लागार यांच्या सहभागातून जागेवरच बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या गेल्या. त्यामुळे नागरिकांनी थेट लाभ घेतला.  या शिबिरांना आदिवासी महिलांचा, युवकांचा आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बँकिंग क्षेत्रावरील विश्वास वाढण्यास मदत झाली. गावातील विविध योजनांविषयीची माहिती व शंका निरसन यासाठीही ही शिबिरे प्रभावी ठरली.  “धरती आभा” अभियानामार्फत ठाणे जिल्हा प्रशासनाचे सर्वसमावेशक आणि तळागाळातील सक्षमीकरणाचे ध्येय जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अभिषेक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विविध राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक आणि त्यांचे कर्मचारी या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून अधिक बळकट होत आहे.

00000000000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या सरकारने पूर्ण न केल्यास राज्यभर आंदोलन छेडणार -माजी खासदार हरिभाऊ राठोड   

vishwatmaklokswamivarta

स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती रॅली कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

भारताने राष्ट्रीय रेड लिस्ट मूल्यांकन-प्राणी प्रजातींच्या संरक्षण…!

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय #क्रीडा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात दिली. तसेच, जिल्ह्यात आधुनिक क्रीडा संकुल उभारणार असल्याची घोषणाही- मंत्री आशिष शेलार

गावकर्‍यांचा संताप उसळला; भ्रष्टाचारग्रस्त मुख्याध्यापक चाऊस यांच्या बडतर्फीची मागणी; उपोषणाचा ईशारा-मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यपद्धतीचे गावकर्‍यांकडून कौतुक; शिक्षक संघटनांच्या दबाव तंत्राची सखोल चौकशी करण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात ‘हलाल प्रमाणपत्रां’वर बंदीची मागणी-उपमुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !