vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग बालकांच्या तपासणीचा पायलट प्रकल्प, १४४ बालकांची तपासणी

दिव्यांग बालकांच्या तपासणीचा पायलट प्रकल्प, १४४ बालकांची तपासणी

 छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी– शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ‘घाटी’ येथे शनिवारी (दि.२१) बालकांच्या दिव्यांगत्व तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १४४ दिव्यांग बालकांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे हा पायलट प्रकल्प राबविण्यात आल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर, दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्वाचे निदान व तपासणी शिबिराचे आयोजन शनिवारी (दि.२१) जिल्हा रुग्णालय घाटी येथील बाह्य रुग्ण विभाग येथे करण्यात आले.    उद्घाटन सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वैशाली प्रशांत फडणीस यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे, अधीक्षक श्रीमती गायत्री तळवडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.जितेंद्र डोंगरे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्रीमती रेशमा चिमंद्रे, समाज कल्याण प्रादेशिक दिव्यांग उपायुक्त दीपक खरात यावेळी उपस्थित होते.

शिबिरात १४४ दिव्यांग बालकांनी तपासणी करण्यात आली. त्यात अस्थिव्यंग – २७, मानसोपचार – ४५, कान नाक व घसा – २०, बालरोग – ३९, नेत्र – १३ यांचा समावेश आहे. यापैकी ३ बालकांना शिबिरातच दिव्यांग विशेष ओळखपत्र (UDID) देण्यात आले, तर ३७ बालकांची UDID प्रक्रिया पुढील आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे. उर्वरित बालकांना पुढील तपासणीसाठी बोलावण्यात आले आहे,असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने कळविले आहे

०००००

संबंधित पोस्ट

मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी,गारगाई धरणाच्या कामासाठी आवश्यक वन्यजीव व पर्यावरण विषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मंजुरी..

आदिवासी विभागाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी  -जिल्हाधिकारी किशन जावळे

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसह  राज्यातील २२ जिल्ह्यांतून १ हजारांहून अधिक मंदिर विश्वस्तांची शासनाकडे जोरदार मागणी देवस्थानांच्या भूमींचे रक्षण करण्यासाठी अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट राज्यात तात्काळ लागू करा !

vishwatmaklokswamivarta

गावदेवी दुर्घटनेतील शहीद सागर शिंदे यांना मानवंदना

संभाव्य पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी ५ कोटी ६२ लाख‌ रुपये खर्चाचा आराखडा तयार १ हजार १६ गावे, वाड्यांचा आराखड्यात समावेश 

vishwatmaklokswamivarta

शेगाव येथे २५ ते २८ फेब्रुवारी ‘राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे’ आयोजन;Ø महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते होणार शुभारंभ…Ø मेळाव्यात सहभागी होण्याचे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आवाहन