vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचाजन्मदिवस सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचाजन्मदिवस सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

जालना प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयाच्या वतीने दि. 26 जून, 2025 रोजी सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रम आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमास केलेल्या अध्यक्षीय भाषणात आमदार अर्जुन खोतकर यांनी राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी दुर्बल व पिडीत घटकांसाठी केलेल्या कार्याचा ऊहापोह करुन शाहु महाराजाचे शिक्षणविषयक कार्य व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी घेतलेला पुढाकार आजच्या परिस्थितीतही तंतोतंत लागु असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्काराचा 5 हजार रुपयांचा धनादेश कु. प्रज्ञा अरविंद सोनकांबळे, मुलींची शासकीय निवासी शाळा, जालना या विद्यार्थीनींस वितरण करण्यात आला. तसेच संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ यांच्यामार्फत सन 2017-18 मधील महिला समृध्दी योजनेअंतर्गत श्रीमती बेबी दशरथ जोहरे, देवका मगन जोहरे यांना प्रत्येकी रुपये 50 हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला.

डॉ. निकेश मदारे यांनी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश अंबुरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दिलीप गिरी यांनी केले. रामेश्वर कर्दळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास जिल्हा व्यवस्थापक तथा विभागीय अधिकारी अरुण राऊत, अनिल सुनगत, सुर्यकांता गोसावी, श्रीमती पाटोळे यांच्यासह नागरिक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य-: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी..

vishwatmaklokswamivarta

सोमठाणा खुर्द येथील जमीन मोबदल्यासाठी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम दि.१० पासून

vishwatmaklokswamivarta

अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती पारदर्शक पद्धतीने;कुठल्याही आमिषाला बळी पडू नका

शैक्षणिक लूटमारीला लगाम; जळगावच्या आदेशानंतर राज्यभर  अंमलबजावणीची गरज ! – सुराज्य अभियान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार–परदेशी विद्यापीठात शिक्षणाचे स्वप्न आता एज्यू सिटी’च्या माध्यमातून पूर्ण होईल- मुख्यमंत्री