vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पोंभुर्णा औद्योगिक वसाहतीबाबत शासन सकारात्मक- उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक

पोंभुर्णा औद्योगिक वसाहतीबाबत शासन सकारात्मक- उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक

मुंबई, प्रतिनिधी: चंद्रपूर जिल्ह्यातील कोसंबी पेठ ता. पोंभुर्णा येथे औद्योगिक वसाहत उभारण्याबाबत शासन सकारात्मक आहे. या औद्योगिक वसाहतीसाठी 102.50 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून संपादनासाठी 6 कोटी 7 लाख 52 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यापैकी 42.59 हेक्टर जमीन संपादनाला थेट खरेदीद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. उर्वरित भूसंपादन प्रक्रिया 60 दिवसात पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात दिली.

पोंभुर्णा औद्योगिक वसाहतीसाठी शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देणेबाबत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी मुद्दा उपस्थित केला होता.

चर्चेच्या उत्तरात राज्यमंत्री श्री. नाईक म्हणाले, थेट खरेदीद्वारे मान्यता दिलेला 42.59 हेक्टर जमिनीसाठी 25 शेतकऱ्यांना 2 कोटी 35 लक्ष रुपयांचा मोबदला देण्यात आलेला आहे. तसेच 19 शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे 34.38 हेक्टर जमिनी निवड स्तरावर असून याच वर्षी ही जमीन संपादित करण्यात येणार आहे.

पोंभुर्णा औद्योगिक वसाहत उभारण्याबाबत अधिवेशन काळातच संबंधित विभागाची बैठक आयोजित करण्यात येईल. तसेच या औद्योगिक वसाहतीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी दौराही करण्यात येईल, असेही उद्योग राज्यमंत्री श्री. नाईक यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

आज होणार लोणार येथे योग महोत्सव बुलढाणा जिल्हयातील नागरीकांनी सहभागी होण्याचे केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आवाहन.

बुलढाण्यात उद्यापासून ‘राजमाता महोत्सव’१५० स्टॅाल्सद्वारे प्रदर्शन व विक्री ; खाद्यपदार्थांची मेजवाणी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कलाकारांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

विधानसभा आश्वासनांचा अवमान थांबवा : अधिकाऱ्यांच्या मुजोरीवर आ. सुधीर मुनगंटीवार आक्रमक- लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचा अवमान सहन केला जाणार नाही – आ. सुधीर मुनगंटीवार यांची परखड भूमिका

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम

यूपीएससी मुख्य परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता मॉक इंटरव्हिव्यूचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मान्सून कालावधीत यंत्रणांनी सज्ज राहावे-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*कृती कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी