भारताचा ऐतिहासिक विजय!-🙌🇮🇳इंग्लंडच्या घरच्या मैदानावर ५८ वर्षांनी ३३६ धावांनी पराभव करून इतिहास रचला
भारताने ३३६ धावांनी दणदणीत विजय मिळवून #ENGvIND कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली! 🙌🇮🇳इंग्लंडच्या घरच्या मैदानावर ५८ वर्षांनी ३३६ धावांनी पराभव करून इतिहास रचला
इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या तरुण भारतीय संघानं बर्मिंगहॅमच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
भारतानं 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला तब्बल 336 धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारतानं मालिकेत 1-1 नं बरोबरी केली आहे.बर्मिंगहॅममध्ये भारतीय संघानं पहिल्यांदाच कसोटीमध्ये विजय मिळवला आहे.कर्णधार शुभमन गिलची विक्रमी फलंदाजी आणि सिराज आणि आकाशदीप यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं हा विजय खेचून आणला आहे.
भारत हा इथं विजय मिळवणारा आशियातील पहिला देश ठरला.