vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेशस्थानिक बातम्या

रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वदेस फाउंडेशन यांच्यातसात तालुक्यामध्ये आरोग्य सुधारण्यासाठी सामंजस्य करार

रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वदेस फाउंडेशन यांच्यातसात तालुक्यामध्ये आरोग्य सुधारण्यासाठी सामंजस्य करार

रायगड प्रतिनिधी- रायगड जिल्ह्यातील आरोग्यसेवांच्या उपलब्धतेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा म्हणून स्वदेस फाउंडेशन आणि रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात (दि.07 जुलै 2025 ) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)रविंद्र शेळके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण यंत्रणा प्रियदर्शनी मोरे, तसेच स्वदेस फाउंडेशनचे संचालक प्रदीप साठे, तुषार इनामदार वरिष्ठ व्यवस्थापक नजीर शिकलगार व मेघना फडके व सहाय्यक व्यवस्थापक जुलेखा शेख उपस्थित होते.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वतीने डॉ.नितीन बावडेकर, स्वदेस फाउंडेशन यांच्यावतीने मंगेश वांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डॉ.सुरेंद्र यादव, उपसंचालक आरोग्य-स्वदेस फाउंडेशन यांनी सामंजस्य करारनाम्यावर स्वाक्षरी केली. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

 या करारनाम्याचा मुख्य उद्देश शासनाच्या आरोग्यसेवा मजबूत करणे आणि ग्रामीण समुदायांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्यात मदत करणे हा आहे. या सहकार्याद्वारे स्वदेस फाउंडेशन आणि रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या मार्फत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी मदत करणार आहे. ही भागीदारी समुदायावर आधारित शासकीय आरोग्य कार्यक्रमांबाबत जनजागृती वाढवेल आणि अत्यावश्यक आरोग्य सेवा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचविण्याची खात्री करेल.

रॉनी स्क्रूवाला आणि झरीना स्क्रूवाला यांची स्वदेस फाउंडेशन रायगड जिल्हामधील महाड, पोलादपूर,माणगाव, तळा, श्रीवर्धन,म्हसळा व सुधागड या तालुक्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणासाठी समग्र 360-अंश दृष्टिकोनातून कार्य करणारी स्वयंसेवी संस्था या तालुक्यामध्ये सामंजस्य करारा मुळे फायदा होणार आहे.

००००

संबंधित पोस्ट

जमीन आरोग्य व्यवस्थापनासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक :डॉ संग्राम काळे*

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय टायगर दिन निमित्त पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं काही दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांची घोषणा केली.वाघ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे; त्याच्या ताकदीच्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती· 2024-25 मध्ये देशाच्या 40 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात· गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 32 टक्क्यांनी अधिक गुंतवणूक….

नागपूर येथील कळमना परिसरातील चिखली लेआऊटमध्ये भीषण आग 

राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नांदेड भक्तिमय ; हिंद- दी- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात  लाखो भाविक नतमस्तक

vishwatmaklokswamivarta