vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत मिलच्या एक तृतियांश जमीन संपादनाच्या नियमाची अंमलबजावणी- मंत्री उदय सामंत

गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत मिलच्या एक तृतियांश जमीन संपादनाच्या नियमाची अंमलबजावणी- मंत्री उदय सामंत

मुंबई, प्रतिनिधी : मुंबईतील गिरणी जमिनीसंदर्भात 2019 पासून लागू असलेल्या नियमावलीनुसार (कलम 58) आणि नवीन डीसीपीआर (कलम 35) अंतर्गत, गिरणीच्या जागेचे तीन सम भाग करून त्यातील एक तृतीयांश (वन थर्ड) जमीन महानगरपालिकेस बगीचे व क्रीडांगणासाठी, एक तृतीयांश गिरणी कामगारांच्या घरांसाठी आणि उर्वरित भाग मालकासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या नियमाची मुंबईत अंमलबजावणी सुरू असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.सदस्य सचिन अहिर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.

उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, या नियमानुसार आतापर्यंत 13,500 घरे बांधण्यात आली असून उर्वरित जमिनीवर काम सुरू आहे. खटाव मिलच्या संदर्भात, 10,228.69 चौरस मीटर जमीन मुंबई महापालिकेला मिळणार असून तितकीच जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी वापरली जाईल. या जागेतून 900 ते 1000 नवीन घरे उभारली जातील.

जर काही मिल कंपाउंडने अद्याप वन थर्ड जमीन दिली नसेल, तर ती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत जागा उपलब्ध न झाल्यास ठाणे, वसई-विरार, परिसरातही कामगारांसाठी घरे देण्यात येतील, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

विशेषलेख- शिवजयंती महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज..

vishwatmaklokswamivarta

कोटगलचा एल्गार: दारूमुक्त गावासाठी महिलांची वज्रमूठ; रेशन बंद करण्यासह ३००० रुपयांचे बक्षीस जाहीर!

🔥 पानिपतची तिसरी लढाई (१७६१)

vishwatmaklokswamivarta

तामिळनाडू येथील जगप्रसिद्ध कार्तिक स्वामी या त्रिपुरा कुंटम मंदिरात पारंपारिक प्रथेनुसार दीप प्रज्वलन करण्यास गेलेल्या  भाविकाने दीप प्रज्वलन करण्यास राज्य सरकारने मनाई केल्यामुळे सरकारच्या निषेधार्थ आत्मदहन केले त्या भक्तास धारावी विभागातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

vishwatmaklokswamivarta

केंद्राकडे प्रलंबित असलेला रोजगार हमी योजनेचा निधी राज्यास तत्काळ मंजूर करावा- : रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

नविण्यामार्ग – संमिशन महाराष्ट्र : हतबल पत्रकारितेला स्वावलंबी बचा राजदीप काळे-व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य महिला शिखर अधिवेशनाची फलश्रुती राज्यनाततून अनेक पत्रकार महिलांचा सहभाग..