vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यात सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना एक वर्षासाठी लागू रायगड जिल्ह्यात ‘भारतीय कृषी विमा कंपनी’ची नियुक्ती

राज्यात सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना एक वर्षासाठी लागू रायगड जिल्ह्यात ‘भारतीय कृषी विमा कंपनी’ची नियुक्ती..

 रायगड, प्रतिनिधी-राज्य शासनाने खरीप २०२५ व रब्बी हंगाम २०२५-२६ या कालावधीसाठी उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, एक वर्षासाठी रायगड जिल्ह्यासाठी ‘भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई’ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून, योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ आहे. अधिसूचित पिके पेरणाऱ्या खातेदारांसह, कुळाने किंवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेत सहभागी होऊ शकतात.
यावर्षीपासून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, ई-पिक पाहणी (Digital Crop Survey App) द्वारे पिकांची नोंदणी व शेतकरी ओळख क्रमांक (AgriStack Farmer ID) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई-पिक पाहणी व विमा यामध्ये तफावत आढळल्यास विमा रद्द होणार असून हप्ता रक्कमही जप्त होणार आहे.
विमा हप्त्याची माहिती:भात पिकासाठी: ₹४५७.५० प्रती हेक्टर,नाचणी पिकासाठी: ₹१०० प्रती हेक्टर(टीप: यंदा एक रुपयात विमा हप्ता योजना लागू नाही.)आवश्यक कागदपत्रे: विहित नमुन्यातील अर्ज,आधार कार्ड,स्वयंघोषणापत्र (पेरणी केलेल्या पिकाचे),भाडेपट्टा करारनामा (आवश्यक असल्यास), संमतीपत्र,बँक पासबुकची प्रत,ई-पिक पाहणी आणि शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य असेल.अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत विमा काढून संभाव्य नुकसानीपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.#पीकविमा
00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-मुदतवाढीची ती बातमी खोटी

एआय’ तंत्रज्ञानाशी करा मैत्री;जिल्हाधिकारीकार्यालयातील प्रशिक्षणात एआय चे धडे

डॉ. संपदा मुंडे प्रकरणात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश,सातारा जिल्हा रुग्णालयाने दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा; पोलीस अधीक्षक कार्यालयाने चार्जशीट वेळेत दाखल करावे

vishwatmaklokswamivarta

महाज्योती संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात येणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

पोस्टाची नवीन पार्सल पॅकेजिंग सुविधा नागरिकांच्या सेवेत

राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार राज्य शासनाचे सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट – उपमुख्यमंत्री