vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

क्रीडा प्रबोधिनीतील मुलींचा विनयभंग करणाऱ्या व्यवस्थापकाला तात्काळ बडतर्फ करा – नंदा पवार यांची प्रशासनाकडे मागणी

क्रीडा प्रबोधिनीतील मुलींचा विनयभंग करणाऱ्या व्यवस्थापकाला तात्काळ बडतर्फ करा – नंदा पवार यांची प्रशासनाकडे मागणी

जालना (प्रतिनिधी) :जालना जिल्हा परिषद क्रीडा प्रबोधिनीतील मुलींवर विनयभंग केल्याप्रकरणी वसतिगृह व्यवस्थापक प्रमोद खरात याच्या विरोधात तात्काळ सेवामुक्ती आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदा पवार यांनी केली आहे.

या प्रकरणात गुरुत्व लक्षात घेता नंदा पवार यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात व्यवस्थापक प्रमोद खरात याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील प्रशासनाच्या हालचाली अपुऱ्या असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

गंभीर स्वरूपाच्या तक्रारी रेल्वे स्टेशन रोडलगत जिल्हा परिषदेच्या निवासी क्रीडा प्रबोधिनी वसतिगृहात काही महिन्यांपासून व्यवस्थापक प्रमोद खरात हा मुलींवर अश्लील चाळे करत असल्याच्या तक्रारी येत होत्या. गटशिक्षण अधिकारी मनोज कोल्हे यांच्या आदेशावरून महिला केंद्रप्रमुख सुजाता भालेराव यांनी वसतिगृहाला दोन दिवसांपूर्वी भेट दिली असता, अनेक मुलींनी व्यवस्थापकाविरोधात गंभीर आरोप केले.

तक्रारीनुसार, खरात हा मुलींना सीसीटीव्ही नसलेल्या खोल्यांमध्ये बोलावून त्यांच्या शरीरावर हात फिरवण्यासारखे विकृत वर्तन करीत होता. याशिवाय, एका मुलीच्या छातीचे मोजमाप घेण्याचा अत्यंत लज्जास्पद प्रकार देखील उघडकीस आला आहे. संबंधित मुलीला धमकावल्याचीही माहिती समोर आली आहे.गुन्हा दाखल, पण बडतर्फी अद्याप नाहीया प्रकाराची गंभीर दखल घेत रविवारी रात्री गटशिक्षण अधिकारी मनोज कोल्हे यांच्या फिर्यादीवरून जालना पोलिस ठाण्यात प्रमोद खरात याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, तो अद्याप सेवेत असून यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नंदा पवार यांनी प्रशासनाकडे ठाम मागणी केली की, “अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीला तात्काळ सेवेतून बडतर्फ करणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो. जर वेळेत कठोर कारवाई झाली नाही, तर महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित पोस्ट

विशेष लेख …राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजना

मुंबईतील वांद्रे येथे अरुणोदय वॉकर असोशियन तर्फे वरिष्ठ नागरिकांना करिता 12 जानेवारीला चालण्याची स्पर्धा…

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सर्व्हेलन्स कॅमेरे बसविलेल्या पोलीस दलाच्या वाहनांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण

सायबर सुरक्षेबाबत जागरूकता लक्झरी नव्हे तर गरज- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्यविद्यापीठात-‘दीनदयाल उपाध्याय अध्यासन’ स्थापन करण्यात येणार-राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची घोषणा