जालना प्रतिनिधी :- वैध मापनशास्त्र यंत्रणेच्या कार्यपध्दतीत पारदर्शकता वाढविणे, लोकसंपर्क दृढ करणे आणि ग्राहक तक्रारीचे वेळेवर निराकरण करणे या उद्देशाने जिल्हा कार्यालयामध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे.
जनता दरबार या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य ग्राहक, ग्राहक संघटना, पॅकबंद वस्तुंचे उत्पादक, किरकोळ विक्रेते व व्यापारी, वजन व मापाचे परवानाधारक या घटकांना थेट संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. उप नियंत्रक वैध मापन शास्त्र, जालना जिल्हा, विकास लॉज, न्यु एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर रोड, जालना या कार्यालयात जनता दरबार आयोजित केला जाणार आहे. असे उपनियंत्रक, वैधमापनशास्त्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.