प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप विमा भरण्यासाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ..
सांगली, प्रतिनिधी: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 मध्ये पीक कापणी प्रयोग उत्पादन आधारित राबवण्यात येत आहे. ही योजना सांगली जिल्ह्यात भात, ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, तूर, मूग, उडीद व कापूस या अधिसूचित पिकासाठी लागू आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै अंतिम तारीख होती, तथापी केंद्र शासनाच्या दि. 1 ऑगस्ट रोजीच्या निर्देशानुसार विमा भरण्यासाठी 14 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
पीक नुकसानीची जोखीम पीक विम्याच्या माध्यमातून उचलून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे कार्य या योजनेतून होत आहे. ही योजना राबविण्यासाठी सांगली जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी या विमा कंपनीची निवड करण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.