vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

डॉल्बी चालकांनो ध्वनी मर्यादेचे पालन कर ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार लेझर लाईटला जिल्ह्यात पूर्णपणे बंदी- पालकमंत्री शंभूराज देसाई

डॉल्बी चालकांनो ध्वनी मर्यादेचे पालन कर ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार लेझर लाईटला जिल्ह्यात पूर्णपणे बंदी- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी- ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने मर्यादा घालून दिलेल्या आहेत. या मर्यादेचे डॉल्बी चालकांनी गणेशोत्सव कालावधीत तंतोतंत पालन करावे. जे डॉल्बी चालक ध्वनी मर्यादेचे पालन करणार नाहीत अशांवर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गणेशात्सव 2025 च्या तयारीचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह सर्व तहसीलदार, नगर पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

लेझर लाईटला जिल्ह्यात पूर्णपणे बंदी घालावी, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, लेझर लाईटमुळे डोळ्यांना इजा होण्याची दाट शक्यता आहे. कुठल्याही सार्वजनिक गणेश मंडळाने लेझर लाईटचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. गौरी विसर्जनानंतर महिला मोठ्या प्रमाणात गणपती पाहण्यासाठी बाहेर पडतात. छेडछाड किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेट्रोलिंगचे प्रमाण वाढवावे.

 विसर्जन मिरवणुकीच्या वेळी कोणत्याही प्रकारचा तंटा निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. गणेशोत्सव काळात नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रशासनाने गणेश उत्सवाचे चांगले नियोजन केले असून यंदाचा गणेशोत्सव सुखात, आनंदात व उत्साहात पार पाडूया, असेही आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.

संबंधित पोस्ट

महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांद्वारे अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – रुपाली चाकणकर जनसुनावणीत महिलांच्या ६८ तक्रारींवर कार्यवाही

vishwatmaklokswamivarta

मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कोणत्याही मदतीची गरज असल्यास, आवश्यक ती मदत पोहोचवली जाईल! पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

पहिले बालकुमार साहित्य संमेलन सोमवारी (दि.२)

vishwatmaklokswamivarta

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

उन्हाळ्यात एकही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील