vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

13 ते 15 ऑगस्ट कालावधीत हर घर तिरंगा अभियान* जिल्हाधिकारी संतोष पाटील* 

13 ते 15 ऑगस्ट कालावधीत हर घर तिरंगा अभियान* जिल्हाधिकारी संतोष पाटील*

सातारा प्रतिनिधी: हर घर तिरंगा हे अभियान सातारा जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यामध्ये विविध घटकांनी उत्साहाने व उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हे अभियान राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे

  जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय व निमशासकीय संस्था, महामंडळे, शासकीय व खाजगी इस्पीतळे व सार्वजनिक आस्थापना व खाजगी आस्थापनांची कार्यालये, कारखाने व दुकाने इत्यादी ठिकाणी तीन दिवसाच्या कालावधीत राष्ट्रध्वज यथोचित सन्मानाने फडकवण्यात यावा.

राष्ट्रध्वज सन्मानाने फडकविताना राष्ट्रगीत व राज्यगीत गावून राष्ट्रध्वजास सलामी देण्यात यावी. तसेच राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी. दि. १३, १४ व १५ ऑगस्ट २०२५ या दरम्यान सुर्योदयानंतर राष्ट्रध्वज फडकवणे व सुर्यास्तापुर्वी राष्ट्रध्वज उतरविणे बंधनकारक राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

उच्च व तंत्र शिक्षणात एकल पाल्य योजना’ राबवण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

अनाथ मुलींमध्ये रमल्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे,सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत ‘आपुलकीचा संवाद’

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार स्पर्धेसाठी 26 ऑगस्टपूर्वी अर्जाचे आवाहन

भटक्या जाती व विमुक्त जमातीतील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्याकरीता प्रयत्नशील- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

आरटीई’ प्रवेशासाठी पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

कर्जत येथे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

vishwatmaklokswamivarta