vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश..

उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश..

मुंबई:- प्रतिनिधी उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने घवघवीत यश मिळवित 14 जागांवर विजय मिळविला आहे. उत्तराखंड राज्यातील गाढवाल ; कुमाव या जिल्ह्यातील ग्रामपंचायत ; जिल्हा परिषद ; नगरपरिषद निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने 14 जागांवर विजय मिळविला आहे. गढवाल भागात रिपब्लिकन पक्षाचे 4 ग्राम प्रधान निवडून आले आहेत. कुमाव क्षेत्र येथे 1 ग्राम पंचायत आणि 4 जिल्हा परिषद सदस्य रिपब्लिकन पक्षाचे निवडून आले आहेत.

आगामी काळात रिपब्लिकन पक्ष उत्तराखंड सहित संपूर्ण उत्तर भारतात विजयी घोडदौड करेल असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला. विधानसभा जिंकण्याचा रस्ता हा स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतील विजयावर अवलंबून असतो. त्यामुळे विधानसभा जिंकून देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या महत्वाच्या आहेत. त्यात रिपब्लिकन पक्षाला मिळालेला विजय हा रिपब्लिकन पक्षाच्या उत्तराखंड मधील पुढील वाटचालीसाठी महत्वाचा आहे असे ना.रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.

#RamdasAthawale #election2025 #facebook #meta #AI

संबंधित पोस्ट

मुंबईतील देवनारमध्ये अमली पदार्थांचा मोठा पर्दाफाश: दोन दिवसांत ₹19.78 लाख किमतीचा 94.494 किलो गांजा जप्त

vishwatmaklokswamivarta

आर्टीच्या प्रशिक्षणाला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसादउमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरळीत होणार- व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री आवास योजनेच्या 5 लाख घरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते15 मे रोजी लोकार्पण- ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

महाराष्‍ट्र लोकभवनाच्या पुढाकाराने बृहन्‍मुंबई महानगरपालिका मंगळवारपासून ‘टीबी मुक्त मुंबई’ अभियान सुरु करीत असून अभियानाचा आरंभ राज्‍यपाल जिष्‍णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता (दि. २६ मे) धारावी व सायन येथे

विधानसभा निवेदन :महसूल मंडळ स्तरावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन

जालना जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा-अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन