vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जनजीवन विस्कळीत झालेल्या मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जनजीवन विस्कळीत झालेल्या मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली

📍 मुंबई/ठाणे-मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जनजीवन विस्कळीत झालेल्या मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले आहेत. मुसळधार पाऊस सुरु असून नागरिकांनी काळजी घ्यावी. आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ठाण्यातील #नौपाडा तसेच कोपरीमधील #चिखलवाडी येथे साचलेले पाणी पंपाद्वारे काढण्याचे निर्देश त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले. ठाण्यात २२५ मिलीमीटर पाऊस पडल्याने सखल भागांमध्ये पाणी साचले असून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत, परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

वांद्रे येथील #मिठी नदी आणि नदी काठच्या परिसराचा त्यांनी भेट देऊन आढावा घेतला. दोन दिवसांपूर्वी विक्रोळी #पार्कसाईट येथे वर्षानगर या डोंगराळ वस्तीवर दरड कोसळलेल्या ठिकाणाची त्यांनी पाहणी केली.

मुंबईतील पावसाच्या परिस्थितीबाबत सकाळी मुंबई महापालिका आयुक्तांशी फोनवर चर्चा झाली आहे. मिठी नदी काठच्या परिसरात ‘एनडीआरएफ’ची पथके, बोटी तैनात आहेत. राज्य सरकार आणि पालिका प्रशासन परिस्थिती हातळण्यासाठी सज्ज आहे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

संबंधित पोस्ट

विशेष लेखः-वाढत्या तापमानात आरोग्याची घ्यावयाची काळजी

विचाराधीन बंद्यांना न्यायाचा मार्ग दाखवणारा विधी साहाय्य उपक्रम· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सुरु असलेला उपक्रम

परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा..

एक ऑगस्टपासून जिल्ह्यात महसूल सप्ताह  –जिल्हाधिकारी किशन जावळे

आंबेडकरी चळवळीचे लोकशाहीर दिवंगत प्रभाकर पोखरीकर यांचे मुंबईत स्मारक उभारणार ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

राज्यांतर्गत पीकस्पर्धा सन 2025-26 जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा