vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत …

 पालघरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत …

मुंबई प्रतिनिधी-

 मागील 48 तासांपासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना आणि प्रामुख्यानं समुद्रकिनारी भागांना पावसानं झोडपलं असून, पुढच्या 24 तासांसाठीसुद्धा या भागांसाठी अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरीचाही यामध्ये समावेश असून, आता पालघर जिल्ह्यातून चिंतेत भर टाकणारं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.

उपलब्ध माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील मासेमारीसाठी गेलेल्या 9 बोटी अद्याप परतल्या नाहीत. तर, वसईतील 3 बोटींशी अद्यापही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळं स्थानिक मासेमारांमध्ये प्रचंड भीती आणि चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

पालघर जिल्यातील सातपाटी बंदरातील 4 बोटी आणि खोचिवडे येथील 2 बोटींनी गुजरातच्या जाफराबाद मधील नवा बंदरात घेतला आसरा घेतल्याचं वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार पालघर जिल्ह्यातील खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या एकूण 19 बोटी समुद्रात अडकल्या होत्या. यामधील 13 बोटी वसई, 2 खोचिवडे तर 4 सातपाटी बंदरातील बोटी होत्या. वसई बंदरातील 13 बोटिंपैकी बोटी 10 बोटी वसई बंदरात रात्री उशिरा परातल्या. मात्र 3 बोटी अद्याप बेपत्ता असल्याचं वृत्त आहे.

खवळलेल्या समुद्रानं धडकी भरतेय…

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार मागील 48 तासांपासून समुद्र खवळलेल्या असून, भरतीच्या वेळी उंचच उंच लाटाही उसळत आहेत. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 65 किमी इतका असल्यानं अद्यापही समुद्रात असणाऱ्या बोटिंसाठी अनेक अडचणी उभ्या राहताना दिसत आहेत. प्रशासनाकडून तीन दिवसांपूर्वीच खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना परतण्याच्या दिल्या होत्या, मात्र असं असतानाही काही बोटींनी किनारा न गाठल्यानं आता हे संकट आणखी गंभीर होतना दिसत आहे.

संबंधित पोस्ट

झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• नागरी सेवा दिन आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’ अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

vishwatmaklokswamivarta

ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी शिबिर संपन्नविविध बँकांच्या 148 खातेदारांचे 3.52 कोटी रुपयांचे खाते पुर्नजीवित

vishwatmaklokswamivarta

मराठी येत नसल्यास रिक्षा चालकांचे परवाने रद्द करणार,बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई  ओला, उबर आणि रॅपिडो यांच्या परवान्यांना तात्पुरती स्थगिती,गायमुख ते छत्रपती शिवाजी चौक मेट्रो-१० प्रकल्पाला गती— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जिल्हा युवा महोत्सव उत्साहात संपन्न 

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’च्या माहिती पुस्तिकेचं, रोजगार हमी विभागाच्या ‘महा रोजगार’ पुस्तकाचं, तसंच मराठी भाषा विभागाच्या ‘अभिजात मराठी’ या पुस्तकाचं प्रकाशन….

पर्यावरणीय दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखडा शिखर समिती बैठक; १७० कोटींच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता