vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

खत विक्रीसाठी नवी एल-१ यंत्रणा अनिवार्य

खत विक्रीसाठी नवी एल-१ यंत्रणा अनिवार्य

द ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – खत विक्रेत्यांकडून खत विक्री करताना आता जुनी यंत्रणा न वापरता नवी एल-१ विक्री यंत्रणा वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्रीय खत विभागाच्या सूचनेनुसार भारतीय आधार प्राधिकरणाने मानांकन दिलेली ही नवी यंत्रणा खत वितरणासाठी अत्यावश्यक आहे.

   जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २० ऑगस्ट २०२५ पर्यंत सर्व खत विक्रेत्यांनी नवी एल-१ विक्री यंत्रणा घेऊन ती कार्यान्वित करणे बंधनकारक आहे. या मुदतीनंतर जुन्या यंत्रणेद्वारे खत विक्री बंद होणार असून सर्व खते केवळ एल-१ विक्री यंत्रणेद्वारेच वितरित केली जाणार आहेत.

     ठाणे जिल्ह्यात एकूण १५३ नवीन एल-१ यंत्रे कार्यान्वित करण्यात आली असून, यासाठी आरसीएफ (RCF) कंपनी नेमण्यात आली आहे. कंपनीकडून ही यंत्रे खत विक्रेत्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

     मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या यंत्रणेच्या अंमलबजावणीस गती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे खत वितरण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व शिस्तबद्धता येणार असून शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळविणे सुलभ होईल.

 खत विक्रेत्यांनी २० ऑगस्टपूर्वी नवी एल-१ यंत्रणा कार्यान्वित न केल्यास त्यांना दुकानातून खत विक्री करता येणार नाही, असा स्पष्ट इशारा कृषी विभागाने दिला आहे.

 अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीतील कृषी अधिकारी किंवा जिल्हा परिषद, ठाणे येथील कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी केले आहे

000

संबंधित पोस्ट

आरोग्य सेवक (पुरुष) पदावरून ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती; मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते आदेश वितरण

ठाणे जिल्ह्यात “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम” अंतर्गत २ हजार ३६५ केंद्रांवर परीक्षा संपन्न जिल्ह्यात २५ हजार ९७६ असाक्षर परिक्षार्थींनी दिली परीक्षा

खरीप हंगामासाठी खते, बी-बीयाणे वितरणाचे काटेकोरपणे नियोजन करावे – मंत्री नरहरी झिरवाळ जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

मुंबई महानगरपालिकेच्या’ एफ’ नॉर्थ कार्यालयासमोरील रस्ता प्रवाशांसाठी ठरतोय जीवघेणा..?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचे भूमिपूजन

नंदूरबार जिल्ह्यातल्या देवगुई घाट परिसरात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर ५३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरु केलं. जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

vishwatmaklokswamivarta