vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आंतरजातीय विवाहित दांपत्यांनीआर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घ्यावा- मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे

आंतरजातीय विवाहित दांपत्यांनीआर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घ्यावा- मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे

 सांगली, प्रतिनिधी आंतरजातीय विवाहित दांपत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी नवीन प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 या योजनेमध्ये अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व विमुक्त जाती, भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती व सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, शीख यापैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास आंतरजातीय विवाह संबोधण्यात येतो. शासन निर्णय दि. 6 ऑगस्ट 2004 व दि. 1 फेब्रुवारी 2010 अन्वये मागास वर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यामधील आंतर प्रवर्गातील आंतरजातीय विवाहितांनाही ही योजना लागू करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी 2010 पूर्वी झालेल्या विवाहास 15 हजार रूपये व तद्नंतर झालेल्या विवाहास 50 हजार रूपये अर्थसहाय्य केले जाते.

 योजनेसाठी पात्रतेचे निकष – अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विवाहित जोडप्यापैकी एक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज्‍/ विमाप्र व दुसरा सवर्णापैकी एक असावा, विवाहाची नोंदणी आवश्यक आहे.

 आवश्यक कागदपत्रे – विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला विवाह नोंदणी दाखला, वराचा व वधूचा (प्राथमिक/माध्यमिक) शाळा सोडल्याचा दाखला, वराचा व वधूचा जातीचा दाखला, वराचे व वधूचे तहसिलदार यांनी दिलेले अधिवास (डोमोसाईल) प्रमाणपत्र, दोन प्रतिष्ठीत व्यक्तींचे वर्तणुकीचे व रहिवासी दाखले, वधू व वराचा एकत्रित फोटो (4X6), विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र, वधू व वर यांचे ओळखपत्र (आधारकार्ड / मतदान कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादीपैकी एक), वधू व वर यांच्या संयुक्त बँक खात्याची पासबुकची सत्यप्रत.

00000

संबंधित पोस्ट

आपले मंत्रालय’ मासिकाचा छत्रपती शिवाजी महाराज विशेषांक प्रकाशित..

vishwatmaklokswamivarta

ऐतिहासिक घटना: भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म

vishwatmaklokswamivarta

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्याची माहिती देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शोक संवेदना**भारतीय सांगीतिक संस्कृतीचा एक अमूल्य वारसा काळाच्या पडद्याआड*-पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई*पद्मविभूषण आशा भोसले यांच्यासाठी मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून शोक संवेदना*

खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी स्थापित 26 समित्यांच्या कामकाजाचा विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी ओवे मैदान, खारघर येथे आढावा घेतला.

vishwatmaklokswamivarta

कुणबी जात प्रमाणपत्रःनागरिकांना मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन