vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई महापालिका निवडणुकीत अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा आरक्षित कराव्यात या मागणीसाठी….

मुंबई महापालिका निवडणुकीत अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा आरक्षित कराव्यात या मागणीसाठी….

*गौतम सोनवणे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांची भेट*

मुंबई प्रतिनिधी  – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जातीच्या 13 टक्के आणि अनुसूचित जमातीच्या 7 टक्के जागा आरक्षित करून लोकप्रतिनिधीत्व संविधानिक तरतुदीनुसार देण्यात येत आहे. त्या प्रमाणे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी 13 टक्के आणि अनुसूचित जमाती साठी 7 टक्के जागा आरक्षित केल्या पाहिजेत या मागणीसाठी आज केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आज राज्य निवडणूक आयुक्त यु पी एस मदान यांची भेट घेतली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव सुमित वजाळे; प्रविण मोरे उपस्थित होते.

मुंबई महापालिकेच्या 228 जागांपैकी केवळ 11 जागा या अनुसुचित जाती साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई मनपा मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात एस सी एस टी च्या जागा आरक्षित करण्यात आल्या पाहिजेत.मात्र अद्याप लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती जमातीला न्याय्य वाटा मिळालेला नाही याबाबत गौतम सोनवणे यांनी राज्य निवडणूक आयुक्त यु पी एस मदान यांचे लक्ष वेधले. लोकसंख्येच्या प्रमाणात मुंबई मनपा मध्ये एस सी एस टी च्या जागा आरक्षित कराव्यात अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आली आहे. मुंबई मनपाच्या सन 1818 सालच्या कायद्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात मनपा च्या प्रभागांची संख्या निर्धारित करण्याचे नमूद आहे. याबाबत कायद्यानुसार योग्य तो विचार करण्यात येईल असे आश्वासन राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी गौतम सोनवणे यांना आश्वासन  दिले

संबंधित पोस्ट

फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे, जबाबदारी पार पाडण्याचे बळ द्विगुणित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फिनिक्स पुरस्काराने सन्मान

vishwatmaklokswamivarta

शहीद दिनानिमित्त क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन; पालकमंत्र्यांसह इतर नेत्यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा, शेतातील तण जाळणाऱ्यांवर  कायदेशीर कारवाईपासून सूट.

कल्याणच्या_ताल_बार_मध्ये_धिंगाणा #पोलिसासह_सहा_जणांवर_गुन्हा

vishwatmaklokswamivarta

आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे, तज्ज्ञांची समिती स्थापन होणार शिवजयंती दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी…

…मी पक्षाचे अध्यक्षपद कायम ठेवणार असल्याचे जाहीर करतो. मी माझा पूर्वीचा निर्णय मागे घेतो, असेही शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं