vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तुंग, आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याहस्ते उद्‌घाटन- शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मानले प्रशासनाचे आभार

तुंग, आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याहस्ते उद्‌घाटन- शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मानले प्रशासनाचे आभार

सांगली, प्रतिनिधी) : राज्याचे अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी आज मिरज तालुक्यातील तुंग आणि वाळवा तालुक्यातील आष्टा, कारंदवाडी येथे भेट देऊन 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या पाणंद रस्त्यांचे उद्‌घाटन करून पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार राजशेखर लिंबारे आदि उपस्थित होते.

तुंग येथे तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या सामंजस्याने तयार करण्यात आलेल्या कृष्णानंद पाणंद रस्त्याचे उद्‌घाटन अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, वाळवा तालुक्यातील आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्यांचेही उद्‌घाटन श्री. खारगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रस्त्याची पाहणी करून त्यांनी संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधला.

महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयामुळे पाणंद रस्ता झाला आहे. या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांनी पाणंद रस्ता खुला केल्याबद्दल समाधान व्यक्त करून अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी अशोक काकडे व महसूल प्रशासनाचे आभार मानून सत्कार केला.

पूर्वी रस्ता नसल्याने त्रास होत होता. मात्र आता हा रस्ता झाल्यामुळे वहिवाट सुलभ झाली असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी त्यांचे रस्ता होण्यापूर्वी व रस्ता झाल्यानंतरचे अनुभव कथन केले. शेतात जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता उपलब्ध असणे हे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहे. शेत व पाणंद रस्ते हे शेतमाल बाजारात पोहोचवण्यासाठी व शेतातील यंत्रसामग्री नेण्यासाठी आवश्यक असलेले मार्ग आहेत. पाणंद रस्ते खुले झाल्यामुळे शेतीसाठी वाहतूक व दळणवळणाची सोय उपलब्ध होऊन शेतीमाल आणि यंत्रसामग्रीची वाहतूक करणे सोपे होत असल्याची भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

00000

संबंधित पोस्ट

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील तानसा धरण पूर्ण भरून वाहू लागला

vishwatmaklokswamivarta

श्रावण यात्रा काळात खाद्यपदार्थांच्या तपासणी करावी   – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश शाळेतील व परिसरातील अन्नपदार्थांची नियमित तपासणी करा श्रावण महिन्यात उपवासाचे पदार्थ विक्री करताना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे ५ हजार ४५९ पोलिसांना मिळणार हक्काचे घर राज्यातील पोलीस अंमलदारांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार दोन वर्षांपासून प्रलंबित डीजी लोनला १७६८ कोटींची मंजुरी,आ. श्री. मुनगंटीवार यांनी मानले मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार…

vishwatmaklokswamivarta

८.८४ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड

vishwatmaklokswamivarta

गोंदिया जिल्ह्यातील वीजप्रश्न लवकरच मार्गी लागणार   – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काँग्रेस व इंडिया-महाविकास आघाडीतील ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि सहकाऱ्यांची भक्कम साथ तसेच कार्यकर्त्यांची अथक मेहनत या साऱ्यामुळेच धारावी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयश्री आमच्या वाट्याला आली, यासाठी मी फार भाग्यवान डॉक्टर ज्योती गायकवाड धारावी विधानसभा आमदार..

vishwatmaklokswamivarta