vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ऑपरेशन प्रहारः अवैध मद्यविक्री प्रकरणी १२२ ढाबाचालक दोषी, लोकअदालतीत २६ खटल्यात ८ लाखांचा दंड वसूल…

ऑपरेशन प्रहारः अवैध मद्यविक्री प्रकरणी १२२ ढाबाचालक दोषी, लोकअदालतीत २६ खटल्यात ८ लाखांचा दंड वसूल…

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल २०२५ पासून ऑपरेशन प्रहार राबविले आहे. त्याअंतर्गत एप्रिल ते ऑगस्ट या दरम्यान जिल्ह्यात अवैध मद्यविक्री व बेकायदा ढाबा चालकांविरुद्ध केलेल्या कारवाईत ४७५ गुन्हे दाखल केले. ८४४ आरोपींना अटक केली. २८ लाख ८ हजार ३८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नुकत्याच झालेल्या लोकअदालतीत २६ खटल्यांची सुनावणी झाली. १२२ आरोपी दोषी ठरले व त्यांच्याकडून ७ लाख ८१ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी दिली आहे.

अवैध मद्यविक्री आणि बेकायदा ढाब्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग एप्रिल २०१५ पासून ऑपरेशन प्रहार राबवित आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ४७५ गुन्हे दाखल केले. ८४४ जणांना अटक करण्यात आली आणि २८ लाख ८ हजार ३८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा विधी सेवा केंद्रामार्फत दि.१३ सप्टेंबर रोजी झालेल्या लोकअदालतीत महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या कलम ६८ आणि ८४ अंतर्गत २६ खटल्यांचा निकाल लागला त्यात १२२ जणांवर दोष सिद्ध झाला. त्यांच्याकडून ७ लाख ८१ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला.दोषसिद्धी मध्ये जिल्ह्याची ही आघाडी आहे.

परवानाधारक ठिकाणांव्यतिरिक्त अवैध मद्यविक्री, त्यास बेकायदा जागा पुरविणे, मद्यपान करणे अशा गैरप्रकारांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कारवाई केली जाईल,असेही अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी कळविले आहे

संबंधित पोस्ट

सांगली जिल्ह्यातील 31 बालके ह्रदय शस्ञक्रियेसाठी मुंबईला रवाना- “सेवा पंधरवडा” अंतर्गत उपक्रम

vishwatmaklokswamivarta

समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे संत रविदास महाराजांचे स्मारक ठरणार समाजासाठी प्रेरणास्थान: खासदार कल्याण काळे-जगतगुरु संत शिरोमणी रविदास महाराज स्मारक समितीतर्फे भव्य स्मारकासाठी साकडे; सामाजिक समरसता आणि एकतेचा जागर करण्याचा खासदारांचा निर्धार

राज्यपालांच्या उपस्थितीत नॅबचा ७४ वा स्थापना दैनंदिन साजरा-अधिकाधिक लोकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प करावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

गावाच्या विकासासाठी जिल्हाधिकारी यांनी बांधला संवादसेतू

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदभरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या पदसंख्येत वाढ – पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन* 

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta