vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्यातील 4 लाख 92 हजार 532 असाक्षरांनी दिली**पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीची परीक्षा*

*राज्यातील 4 लाख 92 हजार 532 असाक्षरांनी दिली**पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीची परीक्षा*

सातारा प्रतिनिधी- केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत संपूर्ण राज्यात रविवारी २१ सप्टेंबर रोजी एकूण 4 लाख 92 हजार 532 असाक्षर व्यक्तींनी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षा दिली असल्याची माहिती राज्यातील पुणे येथील शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक तथा राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणाचे सदस्य सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.

केंद्र शासन पुरस्कृत, “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम” सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात असाक्षरांना साक्षर करण्यासाठी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०२५-२६ मध्ये उल्लास अॅपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा केंद्रशासनाच्या निर्देशानुसार रविवार, दि. २१ राप्टेंचर २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्हयांतील युडायस प्राप्त शाळांमध्ये मराठी, ऊर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तेलगू, तामिळ, बंगाली या नऊ माध्यमातून घेण्यात आली. या परीक्षेतून निकषानुसार परीक्षार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्रशासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून नवसाक्षरांना प्रमाणपत्र व गुणपत्रक एकत्रित देण्यात येणार आहे. या चाचणीच्या माध्यमातून या व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्यआरोग्याची काळजी व जागरुकता, वालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण ही जीवनकौशल्ये विकसित होण्यास होऊन पुढील जीवनमान उंचावण्यास मदत मदत होणार आहे.

परिक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांना राज्यस्तरावरुन व विभागीय स्तरावरुन अधिकाऱ्यांनी निरीक्षक म्हणून भेटी दिल्या आहेत. राज्यातील सर्व शाळा मुख्याध्यापक, शिक्षकांनी परिक्षेचे नियोजन करुन कामकाज यशस्वी केल्याबाबत अभिनंदन करुन शिक्षण संचालक श्री. पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत

0000

संबंधित पोस्ट

देशातील गरिबीचा व उपासमारीचा प्रश्न सोडविण्यापासून गेल्या ७० वर्षांत कोणी अडवले होते, असा प्रश्न मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर-देसाई

रणवीर अल्लाबदिया, समय रैना यांच्याविरुद्ध असभ्य वक्तव्यावरून एफआयआर केल्यानंतर आसाम पोलिसांचे पथक मुंबईत पोहोचले

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या 57व्या निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी उत्साहपूर्वक,भक्तीभावनेने ओतप्रोत निष्काम सेवांचे मनमोहक दृश्य दृष्टीगोचर

vishwatmaklokswamivarta

स्वीप उपक्रमात नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी हस्तकला, रांगोळी प्रदर्शनातून दिला मतदानाचा संदेश…

नवरात्री, दिवाळी आणि छट पूजा या सणांच्या काळात सर्वांना रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळणार, भारतीय रेल्वे 519 विशेष ट्रेन चालवणार…

vishwatmaklokswamivarta

बचतगटांच्या उत्पादनाला मिळणार हक्काची बाजारपेठ : यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे महिला व बालविकास मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन