vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रोहणवाडी येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या : ज्ञानेश्वर उगले यांची मागणी

रोहणवाडी येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या : ज्ञानेश्वर उगले यांची मागणी

जालना (प्रतिनिधी) :मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जालना तालुक्यातील रोहणवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात तसेच घरात पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी ठाम मागणी ज्ञानेश्वर (माऊली) उगले यांनी केली आहे.या अतिवृष्टीची पाहणी महसूल विभागाकडून करण्यात आली. यावेळी महसूल अधिकारी नारायण डाके, ग्रामपंचायत अधिकारी कोथळकर, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती खांडेभराड यांनी हजेरी लावून पिकांचे पंचनामे केले.

याप्रसंगी नुकसानग्रस्त शेतकरी आप्पासाहेब साळसे, दत्ता तनपुरे, बाबासाहेब चाळसे, जपालसिंग बुंदले, किसन उगले, सतीश बुंदले, अजिंक्य उगले, अंकुश बागराज, अण्णासाहेब तनपुरे, गुड्डू शेठ, विठ्ठल काळे यांच्यासह गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांची दैना लक्षात घेता तात्काळ मदतीची गरज असल्याचे प्रतिपादन करून शासनाने तत्पर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

संबंधित पोस्ट

जिल्हा पाणी व स्वच्छता समिती बैठक जलजीवन मिशन’साठी कालबद्ध कार्यक्रम राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांना 7 एप्रिल पर्यंत कर्ज फॉर्म भरण्याचे आवाहन..

वॉक फॉर युनिटी” कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदवावा

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत कुस्ती व लॉन टेनिसविभागीय निवड चाचणी दि.२३ रोजी

डॉ. संजय मुन हे फुले – आंबेडकरी चळवळीचे प्रभावी प्रसारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात रमा यशवंतराव आंबेडकर यांचे गौरोद्गार : डॉ. संजय मुन यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

सुशासनासाठी नागरिकांना सेवा संवेदनशील आणि गतिशीलतेने द्याव्यात- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर.

vishwatmaklokswamivarta