vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली पाहणी

आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली पाहणी

        सांगली, प्रतिनिधी : जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त मौजे विठलापूर, दिघंची, पळसखेल व आवळाई या गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी विटा डॉ. विक्रम बांदल, आटपाडीच्या तहसीलदार शितल बंडगर, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ अधिकारी तसेच महसूल विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेऊन महसूल व कृषी विभागातील संबंधित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करून मदत मिळवून दिली जाईल. शेतकऱ्यांनी धैर्याने या संकटाचा सामना करावा, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा दिलासा शेतकऱ्यांना त्यांनी यावेळी दिला.

00000

संबंधित पोस्ट

वैद्यकीय पर्यटन सुरू करावे- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट

७८ हजार वृक्ष लागवड आणि इंधन बचतीची व्यापक मोहीम – मंत्री प्रताप सरनाईक स्वच्छ, हरित आणि सक्षम एसटी घडवण्याचा संकल्प; एसटीचा ७८ वा वर्धापन दिन

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे एकत्रीकरण महाराष्ट्र दिनी उद्घाटन सोहळा संपन्न

जिल्ह्यात हुंडा विरोधी सप्ताहाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta