vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

चाकूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नुकसानीची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली पाहणी

चाकूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नुकसानीची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली पाहणी

लातूर, प्रतिनिधी : चाकूर आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली. तसेच यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.

चाकूर तालुक्यातील सेवापूर तांडा शिवारात अतिवृष्टीमुळे सखल भागातील शेतजमिनीत पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली. यावेळी अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव यांच्यासह तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधून पिकांचे नुकसान, चाऱ्याची उपलब्धता याविषयी माहिती घेतली.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील चामरगा शिवारातही अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली. तहसीलदार किशोर यादव, नायब तहसीलदार श्री. कांबळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. ऑगस्ट महिन्यातील नुकसानीच्या मदतीचे तातडीने वाटप करावे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

****

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता नगर, गुजरात येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’वर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली

vishwatmaklokswamivarta

आपले मंत्रालय’ मासिकाचा छत्रपती शिवाजी महाराज विशेषांक प्रकाशित..

vishwatmaklokswamivarta

2 वर्षात 200 एस. टी. बसेस पालघर वासियांना मिळणार – आमदार विलास तरे# परिवहन मंत्री तथा सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत निर्णय

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा धर्म,विधानपरिषदेतील अभिनंदन ठरावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उत्तर

जागतिक कौशल्य आशिया स्पर्धा 2025 मध्ये भारताची दमदार कामगिरी, पहिल्याच सहभागात पटकावला आठवा क्रमांक

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागात देश सदैव ऋणात – केंद्रीय गृहमंत्री Amit Shah