vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्याप्रदेश

उष्मालाट जनजागृती उपाययोजनेबाबत कार्यशाळा संपन्न…

उष्मालाट जनजागृती उपाययोजनेबाबत कार्यशाळा संपन्न…

     अमरावती, प्रतिनिधी: उष्मालाट जनजागृती या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या कार्यशाळेचे आयोजन एडीआरए इंडिया व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

  निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसीलदार नितीन खटके, आदित्य खंडारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, जिल्हा साथरोग आरोग्य अधिकारी श्री. अली, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षा गोहत्रे, क्षेत्रीय अधिकारी संतोष गिरी यावेळी उपस्थित होते.उष्मालाट उपायोजना जनजागृती या प्रकल्पाबद्दल इमरान माजिद तर अध्ययनाबाबत माहिती श्रीमती ली यांनी दिली. अनिल भटकर यांनी येणारे दिवसांमध्ये उष्माघाताचे वाढते परिणाम व त्यावर उपाययोजना, कार्य याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. धीरज साळुंखे यांनीही उष्माघात या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेला संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी शेतमजूर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघना क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रविकिरण मोरे तर आभार श्री. सोविक यांनी मानले.

 

00000

संबंधित पोस्ट

मुनावळे येथील जलपर्यटन प्रकल्पासाठी सामंजस्य करार अंतिम टप्प्यात कोयना धरणाच्या शिवसागर जलाशय परिसरात पर्यटनवाढीला चालना मिळणार कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यात द्विपक्षीय करार होणारपालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

रविवारी साता-यात हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत तात्पुरते बदल..

vishwatmaklokswamivarta

पद्मविभूषणउद्योगपती#रतनटाटा यांचे काल रात्री मुंबई येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी.मान्यवरांनी श्री. टाटा यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण..

vishwatmaklokswamivarta

महिला व बालकांसाठीच्या संरक्षण, प्रतिबंधात्मक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा    – जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण रस्त्याचे काममुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखलकरणार- पालकमंत्री शंभूराज देसाई

जरजरी बक्ष उर्स सोहळ्यात भाविकांच्या सुरक्षेस सर्वतोपरी प्राधान्य-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta