vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

क्रीडा धोरणात प्राधान्याने ‘एक खेळ एक संघटनेचा’ समावेश करा-मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

क्रीडा धोरणात प्राधान्याने ‘एक खेळ एक संघटनेचा’ समावेश करा-मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

मुंबई प्रतिनिधी- जागतिक स्तरावर राष्ट्राची उत्कृष्टता साध्य करण्यासाठी, क्रीडा व आर्थिक आणि सामाजिक विकास तसेच क्रीडा लोकचळवळ वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने खेलो भारत नीति 2025 धोरण तयार केले आहे. या धोरणाच्या धर्तीवर राज्य क्रीडा धोरण तयार करण्यात यावे, यासाठी समिती स्थापन करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले. यामध्ये एक खेळ एक संघटनेचा प्राधान्याने समावेश करावा असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्याचे क्रीडा धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संजय बनसोडे, आमदार विजयसिंह पंडीत, आयुक्त शीतल तेली, उपसचिव सुनील पांढरे आणि स्काऊट गाईडचे प्रतिनिधी उपस्थित होते.

क्रीडा मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे म्हणाले, क्रीडा धोरणात प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षणात क्रीडा उपक्रमांचा समावेश, शालेय व जिल्हास्तरीय क्रीडा प्रतियोगितांना प्रोत्साहन देणे, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या धर्तीवर बालपणापासून शारीरिक शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी उपक्रम राबविणे, क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, क्रीडा प्रोत्साहन संस्थांची निर्मिती करणे आदि विषयांचा समावेश करावा. तसेच, आमदार खेळाडू, नैपुण्य प्राप्त खेळाडू, प्रशिक्षक, संघटनांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, पत्रकार, क्रीडा तज्ज्ञ यांचा क्रीडा धोरण समितीमध्ये समावेश करावा. तसेच, खेळाडूंचे याबाबत ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात याव्यात, अशी सूचनाही मंत्री ॲड. कोकाटे यांनी केली.

संबंधित पोस्ट

महिला अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी, वाशिम येथे विशेष न्यायालये

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील प्रसिध्द जांबसमर्थ इथल्या राम मंदिरातून पंचधातूंच्या सहा मूर्ती चोरीला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावेत

: मिझोरामला भूकंपाचा धक्का, 4.7 रिश्टर स्केलची तिव्रता

मध्य पूर्वेतील भू-राजकीय घडामोडींमुळे हवाई क्षेत्रावरील निर्बंध लक्षात घेता, ०१.०३.२०२६ रोजी भारतीय देशांतर्गत विमान कंपन्यांनी चालवलेल्या एकूण ३५० उड्डाणे रद्द 

कृषी समृद्धी नवनगरे विकसित करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घावी- सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta