– काही दिवसापासून पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होत असल्यामुळे अनेक कुटुंबांना पाणीटंचाईचा सामना-
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील शिव, प्रतीक्षानगर, अंधेरी, गोराई या भागात गेल्या काही दिवसापासून पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होत असल्यामुळे अनेक कुटुंबांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पंचशील नगर, प्रतीक्षा नगर, जीटीबीचा परिसर या भागात नागरिकांना अक्षरशः टँकरने पाणी पुरवठा होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली असताना देखील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावं लागतं असल्यामुळे या परिसरात नाराजी आहे. अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व या परिसरात देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यासोबतच विजयनगर सोसायटी, छत्रपती संभाजी नगर, पार्लेश्वर सोसायटी, पोदारवाडी या भागात देखील पाणी कमी येत असल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी आहे.
यासंदर्भात रहिवाश्यांनी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांकडे तक्रार देखील केली आहे. यावर पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे की, ऑक्टोबरमध्ये उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे, त्यामुळे पाण्याचा वापर देखील वाढला आहे. अशी ही बातमी सह्याद्री न्यूज मध्ये ही आलेली आहे