vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रत्येक मुलीने ‘एचपीव्ही’ लसीकरणाचा लाभ घ्यावा : पालकमंत्री जयकुमार रावल जागतिक महिला दिनानिमित्त दोंडाईचा येथे ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

प्रत्येक मुलीने ‘एचपीव्ही’ लसीकरणाचा लाभ घ्यावा : पालकमंत्री जयकुमार रावल

जागतिक महिला दिनानिमित्त दोंडाईचा येथे ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

धुळे प्रतिनिधी, महिलांमधील गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या जिल्ह्यातील प्रत्येक मुलीने एचपीव्ही लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा येथे आज सायंकाळी जिल्हास्तरीय ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री श्री. रावल बोलत होते. या कार्यक्रमास उद्योगपती सरकारसाहेब रावल, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विजय पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी नितीन खंडेराय, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल पाटील, अधीक्षक डॉ. भरत कुलकर्णी, डॉ. संजय मोरे, गट विकास अधिकारी रमेश नेतनराव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रुचिता पवार आदी उपस्थित होते.पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी 2026 रोजी या मोहिमेची राष्ट्रीयस्तरावर सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक राज्याने आपल्या क्षेत्रात एचपीव्ही लसीकरण प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार राज्य शासनानेही ही मोहीम स्वीकारत जागतिक महिला दिनानिमित्त तिची सुरुवात केली असून साधारणतः 90 दिवस ही मोहीम चालणार आहे.

 

संबंधित पोस्ट

नविण्यामार्ग – संमिशन महाराष्ट्र : हतबल पत्रकारितेला स्वावलंबी बचा राजदीप काळे-व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य महिला शिखर अधिवेशनाची फलश्रुती राज्यनाततून अनेक पत्रकार महिलांचा सहभाग..

कराड व कोयनानगर येथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

महाबळेश्वर झाले कार्निवलमय* *कार्निवलमध्ये पर्यटक नागरिक यांचा उस्फूर्त सहभाग**पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते शुभारंभ*

सुदर्शन आठवले यांना २०२४ चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार जाहीर

महिलांच्या सुयोग्य सहभागाने सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास शक्य– विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर दिल्यामुळे भारताच्या दळणवळण खर्चात मोठी कपात झाली आहे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठा निधी, मेट्रो आणि रेल्वे प्रकल्पांना मिळाली गती

vishwatmaklokswamivarta