vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रत्येक मुलीने ‘एचपीव्ही’ लसीकरणाचा लाभ घ्यावा : पालकमंत्री जयकुमार रावल जागतिक महिला दिनानिमित्त दोंडाईचा येथे ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

प्रत्येक मुलीने ‘एचपीव्ही’ लसीकरणाचा लाभ घ्यावा : पालकमंत्री जयकुमार रावल

जागतिक महिला दिनानिमित्त दोंडाईचा येथे ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

धुळे प्रतिनिधी, महिलांमधील गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या जिल्ह्यातील प्रत्येक मुलीने एचपीव्ही लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा येथे आज सायंकाळी जिल्हास्तरीय ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री श्री. रावल बोलत होते. या कार्यक्रमास उद्योगपती सरकारसाहेब रावल, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विजय पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिष पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी नितीन खंडेराय, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल पाटील, अधीक्षक डॉ. भरत कुलकर्णी, डॉ. संजय मोरे, गट विकास अधिकारी रमेश नेतनराव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रुचिता पवार आदी उपस्थित होते.पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी 2026 रोजी या मोहिमेची राष्ट्रीयस्तरावर सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक राज्याने आपल्या क्षेत्रात एचपीव्ही लसीकरण प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार राज्य शासनानेही ही मोहीम स्वीकारत जागतिक महिला दिनानिमित्त तिची सुरुवात केली असून साधारणतः 90 दिवस ही मोहीम चालणार आहे.

 

संबंधित पोस्ट

स्वच्छ भारतसाठी आयटीआय पॅटर्न,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न

vishwatmaklokswamivarta

पोलीस पाटील गिरीधर पाटील यांना मिळाला“विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार 2024”

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगली व मिरज शहरात वाहनांसाठी मनाई आदेश जारी..

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे हरभरा नोंदणीस १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ !आ.मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या पाठपुराव्याला मिळाले यश,

पाणी परवाना, विद्युत उपसा यंत्र परवाने-31 जानेवारीपर्यंत नूतनीकरण करून घ्यावेत..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात एका वर्षांत १५.७२ लाख कोटींची गुंतवणूक,१ लाखांहून अधिक रोजगार निर्मिती – उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

vishwatmaklokswamivarta