vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत रिमझिम पाऊस तर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता…मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे

मुंबईत रिमझिम पाऊस तर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता…मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे

मुंबई प्रतिनिधी

मुंबई शहरात उपनगरात सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे गेल्या चार तासापासून अलका मध्यम स्वरूपाचा पाऊस सतत पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी कामाचा कोळंबा होत असल्याचे दिसून येत आहे तर अनेक ठिकाणी सुट्टीसाठी बाहेर पडलेल्या लोकांनाही आणि पर्यटकांना या पावसाचा फटका बसलेला आहे दिवाळीच्या या पावसामुळे वातावरणात बदल झाल्याचे दिसून येत आहे दिवसाच्या सुरुवातीला उन्हाळ्याच्या क** उन्हाचा चटका बसत असताना सायंकाळी मात्र दुपारी दोनच्या नंतर पावसाची रिमझिम सुरू झाली आहे

अरबी समुद्राच्या मध्यभागी सध्या वादळसदृश वातावरण तयार झाले असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वाऱ्यांचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटर इतका वाढू शकतो, ज्यामुळे किनारपट्टी भागातील रहिवाशांना आणि वाहतुकीसाठी जास्त खबरदारी घेणे आवश्यक ठरणार आहे. हवामान विभागाने या परिस्थितीवर लक्ष ठेवून “यलो अलर्ट” जारी केले आहे, जे नागरिकांना सतर्क राहण्याचे संकेत देत आहे.

विशेषतः कोंकण किनारपट्टी, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून, प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि पावसाच्या वेळी घराबाहेर पडताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. मच्छीमारांना खोल समुद्रात जाण्याचे टाळण्याचे स्पष्ट इशारे दिले गेले आहेत, कारण वाऱ्याचा वेग वाढल्याने समुद्रात बोटींच्या सुरक्षिततेवरही धोका निर्माण होऊ शकतो.

संबंधित पोस्ट

भारतीय मानक विभागाच्या पथकाकडून विरारमधील प्रमाणपत्र नसलेले प्लायवूड विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई

दिव्यांग कल्याण विभागातील सर्व रिक्त पदेपुढील तीन महिन्यात भरणार- दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर – राज्यपाल आचार्य देवव्रत मुलभूत सुविधा, सीमावाद, उद्योग, शेती, शिक्षण व सांस्कृतिक वारसा संवर्धनापर्यंत शासनाचा व्यापक दृष्टीकोन

अनंत चतुर्दशी दिनी होणा-या श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुव्यवस्थित नियोजन

vishwatmaklokswamivarta

संयम, संपर्क, समन्वयाने गणेशोत्सव साजरा करावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या 10 वर्ष पुर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे- निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

vishwatmaklokswamivarta