vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मोंथा चक्रीवादळासह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाऱ्याची दिशा बदलत असल्यानं सतर्क राहा! वादळी वाऱ्यांचा परिणाम समुद्रापासून; मुंबईपासून विदर्भापर्यंत कधीही कुठंही सुरू होणार धुवाधार पाऊस..

मोंथा चक्रीवादळासह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाऱ्याची दिशा बदलत असल्यानं सतर्क राहा! वादळी वाऱ्यांचा परिणाम समुद्रापासून; मुंबईपासून विदर्भापर्यंत कधीही कुठंही सुरू होणार धुवाधार पाऊस..

राज्य प्रतिनिधी-: देशभरात सध्या हवामानात सातत्यानं बदल होत असून, (Cyclone Montha) मोंथा चक्रीवादळासह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाऱ्याची दिशा बदलत असल्यानं याचा परिणाम फक्त आंध्र आणि ओडिशामध्येच नव्हे तर, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागासह विदर्भापर्यंत दिसून येणार आहेत. केंद्रीय हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात एकिकडे किनारपट्टी भागामध्ये वादळी पावसाचा इशारा असतानाच पर्वतीय राज्यांमध्ये हळुहळू थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये पाऊसधारा?

दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि थेट गोव्यासह मराठवाड्यात ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहणार असून, मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी असेल. पूर्व विदर्भात तुलनेनं पावसाचा जोर अधिक राहणार असून इथं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रामुख्यानं चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्यांमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असेल. तर, उर्वरित राज्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण पट्टा, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर इथं मध्यम स्वरुपातील पाऊस आणि पहाटेच्या वेळीचा गारठा असं संमिश्र हवामान पाहायला मिळेल.

मुंबईत दिवसा पावसाच्या सरींची शक्यता…  पावसाचा मुक्काम कायम असून, मुंबईत नेमका कोणता ऋतू सुरुय याचाच थांगपत्ता लागेनासा झाला आहे. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचं क्षेत्र गुजरातकडे सरकत असून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून परिणामी शहरात बुधवार आणि गुरुवारी मुंबईत दिवसासुद्धा कधीही कुठंही या पाऊसधारांची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये पाऊसधारा? दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि थेट गोव्यासह मराठवाड्यात ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहणार असून, मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी असेल. पूर्व विदर्भात तुलनेनं पावसाचा जोर अधिक राहणार असून इथं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रामुख्यानं चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्यांमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असेल. तर, उर्वरित राज्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण पट्टा, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर इथं मध्यम स्वरुपातील पाऊस आणि पहाटेच्या वेळीचा गारठा असं संमिश्र हवामान पाहायला मिळेल.

  अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचं क्षेत्र गुजरातकडे सरकत असून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून परिणामी शहरात बुधवार आणि गुरुवारी मुंबईत दिवसासुद्धा कधीही कुठंही या पाऊसधारांची शक्यता आहे.

संबंधित पोस्ट

प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणे लोक अदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवा – न्या. ईश्वर सूर्यवंशी.जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालयांमध्ये२८ सप्टेंबर, २०२४ रोजी होणार राष्ट्रीय लोकअदालत..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळ पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात – प्रतिदिन सहा कोटींची तूट

vishwatmaklokswamivarta

वसई-विरार महापालिका क्षेत्रात रिंग रोडसाठी नव्याने प्रस्ताव तयार करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र महापालिकेकडे लवकरात लवकर हस्तांतरित करा· महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करा

गणेशोत्सवानिमित्त ओमप्रकाश देवडा बँकेत भास्करराव दानवे यांच्या हस्ते आरती,महाप्रसाद!*

vishwatmaklokswamivarta

दिशा सालियान मृत्यू प्रकरण- वडिलांनी उभाठा नेते आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल,नव्याने सीबीआय चौकशीची मागणी…

आनंदवनाशी जुळलेल्या सर्वांना आत्मिक समाधान मिळते त्यामुळेच #आनंदवन हे खऱ्या अर्थाने मानवतेचे मंदीर आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. #बाबाआमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात व्यक्त केल्या.

vishwatmaklokswamivarta