vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

भारत सरकारने देशातील प्रवासी नागरिकांसाठी ‘भारत टॅक्सी’ ही नवी सेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय…

भारत सरकारने देशातील प्रवासी नागरिकांसाठी ‘भारत टॅक्सी’ ही नवी सेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय…

राज्य प्रतिनिधी -भारत सरकारने देशातील प्रवासी नागरिकांसाठी ‘भारत टॅक्सी’ ही नवी सेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. खाजगी टॅक्सी कंपन्यांच्या वाढत्या भाड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा, सुरक्षित आणि पारदर्शक प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या योजनेचा पहिला टप्पा नोव्हेंबर 2025 पासून दिल्लीमध्ये सुरू होणार असून, डिसेंबर 2025 पर्यंत ही सेवा संपूर्ण देशभर विस्तारण्यात येणार आहे.

ही योजना सहकार मंत्रालय आणि ई-शासन विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून राबवली जाणार आहे. या सेवेसाठी ‘भारत टॅक्सी’ नावाचे विशेष मोबाईल अनुप्रयोग तयार करण्यात आले आहे. प्रवासी या अ‍ॅपच्या माध्यमातून टॅक्सी सहज बुक करू शकतील, चालकाचे स्थान पाहू शकतील तसेच प्रवासाचा अंदाजे वेळ आणि भाड्याची माहिती मिळवू शकतील.

या टॅक्सी सेवेत महिलांसाठी विशेष सुरक्षितता बटण, आपत्कालीन संपर्क सुविधा, डिजिटल पेमेंट व्यवस्था आणि चोवीस तास ग्राहक सेवा उपलब्ध असेल. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, खासगी कंपन्यांच्या तुलनेत ‘भारत टॅक्सी’ सेवेचे दर तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी असतील.

संबंधित पोस्ट

लातूरकरांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य ‘मिनी सरस व जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन’

नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यक; जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन – रणजितसिंह राजपूत

vishwatmaklokswamivarta

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहयोगाने नवी मुंबईतील गावठाण क्षेत्रात विशेष स्वच्छता मोहीम**श्रीसदस्यांसह नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांना सेवाभावी आदरांजली*

शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी ६ मार्चपर्यंत मुदतवाढ…

जालना शहरातील राजपूतवाडी येथील जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर येण्यामागील कारण स्पष्ट• नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

अग्निशिखा’ ई व ऑडिओ बुकच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांचा जीवन प्रवास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta