vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पदयात्रादेशाच्या एकात्मतेसाठी कटीबद्ध राहू या- इमाव कल्याण मंत्री अतुल सावे

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पदयात्रादेशाच्या एकात्मतेसाठी कटीबद्ध राहू या- इमाव कल्याण मंत्री अतुल सावे

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी स्वातंत्र्य लढा व स्वातंत्र्यानंतर अखंड भारत निर्माणात सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या या दृढनिश्चय आणि समर्पित योगदानाचे स्मरण करीत आपण प्रत्येक जण देशाच्या एकात्मतेसाठी सदैव कटीबद्ध राहू या, असे आवाहन राज्याचे इतर मागासवर्ग बहुजन कल्याण, अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेचा समारोप शहागंज येथील उद्यानात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा युवा अधिकारी मेघा सनवार, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) आश्विनी लाठकर, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

पदयात्रा सकाळी ७.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयापासुन सुरु झाली. तेथून ‘भारत माता की जय’, ‘सरदार वल्लभभाई पटेल अमर रहे’, अशा घोषणा देत ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालय ते सरदार वल्लभभाई पटेल पुतळा, शहागंज येथे आली. तेथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

येथे उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. तसेच स्वदेशी वस्तू वापराबाबत शपथ देण्यात आली. यावेळी खा. डॉ. भागवत कराड यांनी सरदार पटेल यांच्या राष्ट्र उभारणीतील योगदानाची उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर मंत्री अतुल सावे यांनी उपस्थितांना संबोधित केले व सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशाच्या एकात्मतेसाठी कटीबद्ध राहण्याचे आवाहन केले.

या रॅलीत सर्व शासकीय कर्मचारी- अधिकारी, राजकीय- सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा संघटना, सामाजि संघटना यांनी या पदयात्रेत सहभागी झाले होते.

०००००

संबंधित पोस्ट

ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती जालनाच्या वतीने खालील मागण्या बाबत माननीय श्री चंद्रमोहन चिंतन साहेब उपदेशक परिवहन अधिकारी जालना यांना निवेदन सादर

मानवी जाणिवा कायम ठेवून प्रशासकीय कामकाज करा- ॲड. धर्मपाल मेश्राम पारधी समाज बांधवांची विविध विषयावर निवेदने, मागण्या सादर..

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

पुढील ३-४ तासांत मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५० ते ६० किमी प्रतितास वेगवान वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणातील बाधितांना सानुग्रह अनुदान द्यावे – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मिहान प्रकल्पातील पुनर्वसन धोरणानुसार नियोजन करुन सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta