vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना चा सत्याचा मोर्चा सुरू

मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना चा सत्याचा मोर्चा  सुरू

मुंबई प्रतिनिधी-: मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी  एल्गार पुकारणार आहेत.

महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या रस्त्यावरच स्टेज मांडून हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला उद्धव ठाकरे राज ठाकरे आदित्य ठाकरे, अमित ठाकरे उपस्थित आहेत.

निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत मनसे आणि महाविकास आघाडीकडून सत्याचा मोर्चा काढण्यात येत आहे. लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर  मुंबईतील फॅशन स्ट्रिटवरून सुरू झाला आहे. मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबेल. दरम्यान राज ठाकरे सहभागी होण्यासाठी चर्चगेटला लोकलने प्रवास करत पोहोचले आहेत. सध्या ते वेस्ट एंड हॉटेलमध्ये थांबले आहेत.

विरोधकांच्या नेमक्या मागण्या काय-

1. मतदारयाद्या अद्ययावत करा.2. मतदारयाद्यांतील दुबार नावे काढा.3. मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा.

मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इथे स्टेज उभारण्यात आला आहे या ठिकाणी प्रत्येक पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची भाषण होतील.ज्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात शेकाप जयंत पाटील व इतर काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणे होतील.राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारा विरोधात हा मोर्चा असणार आहे… मत चोरी, दुबार मतदार, मतदार यादीतील घोळ या सगळ्याची पुरावे राज्य निवडणूक आयोगाला देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हा मोर्चा काढण्यात आला आहे थोड्या वेळात नेत्यांची स्टेजवर भाषणे सुरू होणार आहे

संबंधित पोस्ट

दिल्ली विधानसभा निवडणूक -आप’ला सर्वात मोठा धक्का! अरविंद केजरीवाल पराभूत

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक संवादात शौर्य, प्रत्येक प्रयोगात देशभक्ती –5000 व्यांदा उजळला इतिहास” मनोज सानप यांचा ऐतिहासिक प्रवास”

vishwatmaklokswamivarta

अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त

नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला मान्यता,भविष्यात रस्ता बनविताना परिसरात विकासाची ‘इकोसिस्टीम’ निर्माण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान मोदी भोपाळमध्ये विकास परिषदेचे उद्घाटन करणार

मुंबई शहर आणि उपनगरात तील काही विभागामध्ये मंगळवार दिनांक ७ ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दहा टक्के पाणी कपात- मुंबई महानगरपालिका