vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील 3 नगर परिषदांमध्ये 68 जागांसाठी 92 हजार 864 मतदार*

*जिल्ह्यातील 3 नगर परिषदांमध्ये 68 जागांसाठी 92 हजार 864 मतदार*

 

​गडचिरोली, प्रतिनिधी] – जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तीन नगर परिषद अंतर्गत एकूण 68 सदस्य जागांसाठी निवडणूक होणार असून यात जिल्ह्याभरातून एकूण 92 हजार 864 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, यासाठी या नगरपरिषद क्षेत्रात 105 मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली असून निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली आहे.

*​नगर परिषद निहाय तपशील*गडचिरोली नगर परिषद येथे सर्वाधिक 43,513 मतदार असून, त्यांच्यासाठी 46 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या नगर परिषदेत एकूण 27 सदस्यांची निवड होणार आहे.देसाईगंज नगर परिषदेत एकूण 26,352 मतदार असून, 32 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडेल. या ठिकाणी एकूण 21 सदस्यांची निवड केली जाईल.

​आरमोरी नगर परिषदेमध्ये 22,999 मतदार आहेत, जे 27 मतदान केंद्रांवर मतदान करतील. आरमोरीसाठी एकूण 20 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे.

*​आरक्षण आणि महिला प्रतिनिधीत्व*या निवडणुकीत महिला प्रतिनिधीत्वावर विशेष भर देण्यात आला आहे. तिन्ही नगर परिषदांमध्ये निवडून द्यावयाच्या एकूण 68 सदस्यांपैकी तब्बल 35 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.प्रवर्गनिहाय राखीव जागांची माहिती: एकूण 68 जागांपैकी ३१ जागा सर्वसाधारण, १८ जागा नामाप्र (नामांकित मागास प्रवर्ग) साठी, 11 जागा अनुसूचित जाती आणि 8 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.

​महिला आरक्षणाचा तपशील: गडचिरोली नगर परिषदेतील 27 पैकी 14 जागा, देसाईगंज नगर परिषदेतील 21 पैकी 11 जागा आणि आरमोरी नगर परिषदेतील 20 पैकी 10 जागा स्त्रियांसाठी राखीव आहेत. यामध्ये विविध प्रवर्गातील स्त्रियांना संधी मिळाली आहे. गडचिरोलीत सर्वसाधारण गटातील 6 जागा, देसाईगंजमध्ये सर्वसाधारण गटातील 6 जागा आणि आरमोरीमध्ये सर्वसाधारण गटातील 3 जागा स्त्रियांसाठी राखीव आहेत.

संबंधित पोस्ट

बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणारभविष्यात बिबट्यांच्या हल्ल्यात एकही मृत्यू होणार नाही यासाठी यंत्रणा सतर्क– वन मंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta

राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती; खत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्राच्या प्रभावी नेतृत्वामुळे संकटातही देश स्थिर; महाराष्ट्र शासन केंद्राच्या सूचनांचे पूर्णपणे पालन करेल

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले अपघातातील मृत्युमुखींच्या कुटुंबियांचे सांत्वन 

कल्याणमधला धक्कादायक प्रकार-मराठी तरुणीला परप्रांतीय कडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ‘कलाविष्कार २०२५’ साजरा,अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा मंच महत्वाचा- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे“आदर्श जिल्हा” आणि “उत्तम कार्यकर्ता” पुरस्कार जाहीरठाणे जिल्हा समन्वय समितीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

vishwatmaklokswamivarta