vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

ऐरोली येथे स्वयंरोजगार मेळावा संपन्न…

ऐरोली येथे स्वयंरोजगार मेळावा संपन्न…

ठाणे, प्रतिनिधी :- संत सावतामाळी मंडळ व सृजन संवेदना फाउंडेशन यांच्या वतीने दि.1 नोव्हेंबर 2025 रोजी ऐरोली येथे स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्हा कौशल्य विकास विभागा व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे स्टॉल लावण्यात आला होता. मेळाव्यास उपस्थित अभ्यागतांनी स्टॉल वर भेट देऊन विविध योजनांची माहिती जाणून घेतली

या मेळाव्याचे उद्घाटन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, वन मंत्री गणेश नाईक आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमात परिसरातील स्वयंरोजगाराकरिता इच्छुक असणाऱ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालयाचे अनंत माळी यांनी उपस्थितांना विभागांतर्गत येणाऱ्या सर्व योजानांबद्दल माहिती दिली.

या प्रसंगी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी स्टॉलला भेट दिली. यावेळी जिल्हा कौशल्य विकास विभागाकडून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाचे अधिकारी श्री.राजू साबळे, रोहित कुलकर्णी, माहिदीप सिंग, आकाश गोरे व अण्णासाहेब पाटील माहामंडळाचे राजेश बडे, संदेश काटकर व शुभम शिंदे हे समन्वयक उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

सणासुदीच्या काळातही विजाभज आश्रमशाळा कर्मचारी वेतनापासून वंचित आश्रमशाळा वेतनासाठी तरतूद द्या – आमदार सुधाकर अडबाले यांचे प्रधान सचिवांना निवेदन..

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना; विभागीय कार्यशाळा-संपूर्ण विभागात कालबद्ध कार्यक्रम राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

vishwatmaklokswamivarta

तीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग व पवित्र वारी यांचा अवमान सहन करणार नाही !वारीत नास्तिकतावाद व अर्बन नक्षलवादाचा अजेंडा राबवणार्‍यांवर सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे ! – समस्त वारकरी संप्रदाय व संघटना

vishwatmaklokswamivarta

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार   * निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध..

एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीसह, एक लाख रोजगार संधी आणणाऱ्या प्रकल्पांना मान्यता…

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग गुणवत्तापूर्ण कार्यासाठी तीसहून अधिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरवमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन..