vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सोमवारी ‘युनिटी वॉक’चे आयोजन*युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

सोमवारी ‘युनिटी वॉक’चे आयोजन*युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

      अमरावती, प्रतिनिधी: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सोमवार, दि. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता युनिटी वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. विमलाबाई देशमुख सभागृहातून या रॅलीला सुरवात होणार आहे. यात युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.   पदयात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक पार पडली. यावेळी मेरा युवा भारतच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्यासह राष्ट्रीय छात्र सेना, राष्‍ट्रीय सेवा योजना, आरोग्य, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

  मेरा युवा भारत, केंद्रीय युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंती निमित्त ‘सरदार @ १५०’ एकता अभियान जिल्हास्तर युनिटी मार्च, पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही पदयात्रा विमलाबाई देशमुख सभागृहातून निघून पंचवटी चौक, इर्विन चौक येथे येणार आहे. इर्विन चौकात पथनाट्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर ही पदयात्रा गर्ल्स हायस्कूल चौक येथून निघून विमलाबाई देशमुख सभागृहात समारोप होणार आहे. पादयात्रेत सहभागी होण्यासाठी माय भारत पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.

      पदयात्रेच्या अनुषंगाने पोलिसांची परवानगी घेण्यात यावी. तसेच पोलिस विभागाने पदयात्रेसाठी सहकार्य करावे. महापालिकेने पदयात्रेच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने पदयात्रेदरम्यान आरोग्य पथक तैनात करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्या. पदयात्रेत राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, खेळाडू, पोलिस भरतीतील युवक, विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच सध्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता सुरू असल्याने पदयात्रा आयोजनात आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

0000

संबंधित पोस्ट

भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार मा.रविंद्रजी चव्हाण जालन्यात-भाजपाचा संवाद मेळावा; सर्वांनी उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर दिल्यामुळे भारताच्या दळणवळण खर्चात मोठी कपात झाली आहे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठा निधी, मेट्रो आणि रेल्वे प्रकल्पांना मिळाली गती

vishwatmaklokswamivarta

काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकाचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश**”रोबोटिक बोयो” ची उपयुक्तता पुन्हा झाली अधोरेखित*

देवळाली येथील आरक्षित जागेवर हस्तांतरणीय विकास हक्क गैरव्यवहाराबाबत चौकशी करून अहवाल सादर करा- सभापती प्रा.राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका-प्रसिध्दीकरिता – व्यापक जनसहभागातून नवी मुंबईत ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा  

अरुणोदय वॉकर्स असोसिएशनची 32 वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta