vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारणस्थानिक बातम्या

माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांचा मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश

माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांचा मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश

     राज्य प्रतिनिधी- लातूर ग्रामीणचे काँग्रेसचे माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माजी मंत्री भगवंत खुबा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला या प्रवेशाने लातूर ग्रामीण मतदार संघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीचे चिञ बदलणार असून हा काॅग्रेस पक्षाला मोठा झटका आहे.

          काँग्रेस नेतृत्वाच्या एकाधिकार आणि हुकूमशाही कारभारामुळे गेली अनेक दिवसापासून अस्वस्थ असलेले लातूर ग्रामीण मतदार संघातील काँग्रेसचे माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत गुरुवारी उदगीर येथील भाजपा महायुतीच्या प्रचार जाहीर सभेत राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माजी मंत्री भगवंत खुबा साहेब यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील, माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड, औसा विधानसभेचे आमदार श्री अभिमन्यू पवार, माजी मंत्री उदगीरचे आमदार श्री संजय बनसोडे, माजी आमदार ज्येष्ठ नेते गोविंदांना केंद्रे, भाजपाच्या नेत्या डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर, गणेश दादा हाके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

        आगामी काळात होणाऱ्या रेणापूर नगरपंचायतीसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर अँड त्रिंबकनाना भिसे यांचा भारतीय जनता पार्टी प्रवेश झाल्याने लातूर ग्रामीण मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

संबंधित पोस्ट

पेट्रोल-डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; नागरिकांनी संयम पाळून अफवांपासून दूर राहावे : कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

सामाजिक न्याय दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महानगरपालिका भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि मुंबई विद्यापीठ यांच्यामध्ये स्मारकात पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा सामंजस्य करार*

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल! राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, तर निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार. आजपासून आचारसंहिता लागू! राज्य निवडणूक आयोगाची घोषणा….

vishwatmaklokswamivarta

जलसंपदा विभागाचा ‘रिपोर्ट कार्ड’ मुख्यमंत्र्यांना सादर अहवाल देणारे विखे पाटील ठरले पहिले मंत्री

नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता मतदारांना 15 जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर..

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कॉपी मुक्त अभियान-मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta