vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उथळ पाण्यात कार्यरत ‘अंजदीप’ हे तिसरे पाणबुडीरोधी लढाऊ जहाज नौदलाकडे सुपूर्द

उथळ पाण्यात कार्यरत ‘अंजदीप’ हे तिसरे पाणबुडीरोधी लढाऊ जहाज नौदलाकडे सुपूर्द

नवी दिल्ली प्रतिनिधी

आठ एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी (पाणबुडीविरोधी, उथळ पाण्यात कार्यरत लढाऊ जहाज) पैकी ‘अंजदीप’ हे तिसरे, स्वदेशी पद्धतीने संरचित आणि कोलकात्याच्या गार्डन रिच जहाजबांधणी आणि अभियंते (जीआरएसई) कंपनीद्वारे निर्मित जहाज आज 22 डिसेंबर 2025 रोजी चेन्नई येथे नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले.

सरकारी-खासगी भागीदारी अंतर्गत जीआरएसई आणि कत्तुपल्ली येथील एल अँड टी शिपयार्ड यांच्याद्वारे संयुक्तपणे भारतीय नौवहन रजिस्टर (आयआरएस) मधील वर्गीकरण नियमांनुसार एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी जहाजांची रचना आणि बांधणी आहे.

वॉटरजेट्सद्वारे चालवली जाणारी अंदाजे 77 मीटर लांबीची ही जहाजे, भारतीय नौदलातील सर्वात भव्य लढाऊ जहाजे असून, पाण्याखालील धोक्यांचा परिणामकारक शोध आणि मारा शक्य करण्याच्या दृष्टीने या जहाजांमध्ये अत्याधुनिक हलक्या वजनाचे टॉर्पेडोज, स्वदेशी तंत्रज्ञानाने संरचित पाणबुडी-विरोधी रॉकेट्स आणि उथळ पाण्यात चालणारी सोनार यंत्रणा बसवण्यात आली आहे. हे जहाज नौदलाच्या पाणबुडीविरोधी क्षमता, तटवर्ती देखरेख अधिक मजबूत करेल.

हे जहाज म्हणजे आयएनएस अंजदीप या 2003 मध्ये सेवा समाप्ती करण्यात आलेल्या पेट्या वर्गातील जहाजाचे पुनरुज्जीवित रूप आहे. भारताच्या विशाल सागरी क्षेत्राच्या संरक्षणाची बांधिलकी अधोरेखित करत, कर्नाटकमधील कारवारच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या अंजदीप या बेटाच्या नावावरून या जहाजाचे नामकरण करण्यात आले.अंजदीप हा केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला पुढे नेत, 80%हून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करत, भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजबांधणीविषयक प्रयत्नांच्या मार्गातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे जहाज देशांतर्गत संरक्षण उत्पादन परिसंस्थेचा विकास आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांचा दाखलाच आहे.

संबंधित पोस्ट

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री अतुल सावे शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी

गोर-गरीब राहत असलेल्या वस्त्यांमधील नागरी सुविधांसाठीमहानगर पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर..

vishwatmaklokswamivarta

सावित्री जत्रा’ महिलांना स्वावलंबी करणारी चळवळ-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिनी सरस सावित्री जत्रा’ जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन

गडचिरोलीचे स्वतंत्र व्हिजन ठरवा; राष्ट्रीय सरासरीपेक्षा पुढे जाण्याचे लक्ष्य ठेवा”*सहसचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचेकडून प्रधानमंत्री धनधान्य किसान योजनेचा आढावा*

vishwatmaklokswamivarta

प्रतिस्पर्ध्यांना आसमान दाखवत पै.शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगिर ठरले जलसम्राट केसरीचे मान—-जवळपास एक हजार मल्लांचा सहभाग @ बक्षिसापोटी लाखो रुपयांची लयलूट @ कुस्तीप्रेमिंच्या डोळ्याचे फिटले पारणे

vishwatmaklokswamivarta