ठाकरे बंधूची युती सत्ता , स्वार्थ आणि अस्तित्वासाठी असून कोणाच्याही युती किंवा आघाडी झाल्या तरी महायुती भक्कम आहे – शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
ठाकरे बंधूची युती सत्ता , स्वार्थ आणि अस्तित्वासाठी असून कोणाच्याही युती किंवा आघाडी झाल्या तरी महायुती भक्कम आहे – शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
राज्य प्रतिनिधी-ठाकरे बंधूची युती सत्ता , स्वार्थ आणि अस्तित्वासाठी असून कोणाच्याही युती किंवा आघाडी झाल्या तरी महायुती भक्कम आहे – शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. यावेळी ते म्हणाले
काही लोक मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात. आधी अंडी खात होते, आता कोंबडीच कापून खाण्यासाठी एकत्र आले आहेत अशा शब्दात टीका केली. लोकशाहीत युती-आघाड्या होत असतात, शिवसेना भाजपची युतीने गेल्या साडेतीन वर्षात महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम केले आहे. लोकाभिमुख, कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या आहेत. आता मात्र जे एकत्र आले आहेत ते सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आले असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
त्रकार परिषदेत मुंबईच्या विकासावर एकही शब्द नव्हता, मात्र आमच्याकडे सांगण्यासारखी भरपूर कामे आहेत. मुंबईत क्लस्टर पुनर्विकास, इमारतींना ओसी देणे, पागडीमुक्त मुंबई करणे, पुनर्विकास योजना, रस्ते काँक्रीटीकरण, एसटीपी प्लांट, मेट्रो प्रकल्प, कारशेड, आरोग्य सुविधा देण्याचे काम आम्ही केले असल्याचे याप्रसंगी निक्षून सांगितले. तर मुंबईकरांना आणि मराठी माणसाला वसई, विरार, नालासोपारा इथे घालवण्याचे काम त्यांनी केले असल्याचे यावेळी नमूद केले