
विधानपरिषद साठी भास्कर आबा दानवे यांच्या उमेदवारीची शिफारस करा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवेंना निवेदन
जालना (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर व जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर मुकुंदराव दानवे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी भाजपा जालना महानगरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकनेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे आज दि. 20 मे २०२६ रोजी जालना येथे निवेदनाद्वारे केली.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भास्कर आबा दानवे हे सलग जालना विधानसभा मतदारसंघात पूर्णवेळ संघटन बांधणीचे कार्य केले आहे. त्यांनी मतदारसंघात भाजपा पक्षाच्या शाखा स्थापन करून पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी जालना नगरपरिषद उपनगराध्यक्ष, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, १०१-जालना विधानसभा प्रमुख तसेच सध्या जालना महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आगामी विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून भास्कर आबा दानवे यांना उमेदवारी मिळावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश नेतृत्वाकडे शिफारस करावी, अशी मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली व “पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या आणि कार्यकर्त्यांमध्ये मजबूत संपर्क असलेल्या भास्कर आबा दानवे यांना पक्षाने संधी दिलीच पाहिजे,” अशी भावना देखील यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.



