vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नरनाळा महोत्सवात ‘इन्व्हेस्टर्स मीट’ : पर्यटन क्षेत्रातील संधींबाबत मंथनगुंतवणूकदारांना सहभागी होण्याचे आवाहन

नरनाळा महोत्सवात ‘इन्व्हेस्टर्स मीट’ : पर्यटन क्षेत्रातील संधींबाबत मंथनगुंतवणूकदारांना सहभागी होण्याचे आवाहन

अकोला, प्रतिनिधी नरनाळा निसर्ग महोत्सवात गुंतवणूकदारांची परिषद (इन्व्हेस्टर्स मीट) दि. 17 फेब्रुवारी रोजी दु. 2 वा. शहानूर येथे आयोजित करण्यात आली असून, पर्यटन विकासाच्या शक्यता, संधींबाबत माहिती देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन आणि अकोट वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या सहकार्याने नरनाळा महोत्सवाचे आयोजन दि. 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. मेळघाटचे वनवैभव व ऐतिहासिक महात्म्य लाभलेला नरनाळा किल्ला परिसरात पर्यटन विकासाच्या अनेक शक्यता व नानाविध संधी आहेत. त्याबाबत परिषदेद्वारे माहिती देण्यात येणार आहे. या परिषदेत गुंतवणूकदारांना हेरिटेज टुरिझम, इको-टुरिझम, साहसी पर्यटन, हॉस्पिटॅलिटी. पायाभूत सुविधा, पर्यटनस्थळ विकास, व्यवसाय सुलभता, संबंधित योजना याबाबत जाणून घेता येणार आहे

 तरी अधिकाधिक गुंतवणूकदारांनी या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना, उपवनसंरक्षक राहूलसिंह टोलिया व जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.   संपर्क : 📞 +91 8092343431✉️ asinhg@linpico.in

000000

संबंधित पोस्ट

कामगारांच्या कल्याणातून घडतोय समृद्ध महाराष्ट्र ! १ मे कामगार दिनानिमित्त लेख….

गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा दि न्यू इरा हायस्कूलमध्ये आयोजन

vishwatmaklokswamivarta

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

भारतीय राज्यघटनेची उद्देशिका जिल्ह्यातील १० लाख घरांपर्यंत पोहोचवू – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते “घर घर संविधान” उपक्रमाचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

दृष्टिहीन विद्यार्थिनी, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनी, मुंबई महानगर पालिकेअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी तसेच पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना राखी बांधली

आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी-संगठन मजबूत करावे – भास्कर (आबा) दानवे,जालना शहरातील संग्राम नगर येथे भाजयुमो चे शाखा उदघाटन

vishwatmaklokswamivarta