vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत ‘47°C’ लघुचित्रपट प्रदर्शन व उपाययोजना संवाद कार्यक्रम संपन्न

मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत ‘47°C’ लघुचित्रपट प्रदर्शन व उपाययोजना संवाद कार्यक्रम संपन्न

 

     नवी मुंबई प्रतिनिधी-  मुंबई क्लायमेट वीकचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका, प्रोजेक्ट मुंबई आणि एसआयईएस इन्स्टिट्यूट, नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘47°C’ या लघुचित्रपटाचे प्रदर्शन व त्यानंतर उपाययोजनांवरील संवाद कार्यक्रम संपन्न झाला.

लघुचित्रपटानंतर ‘हवामान बदल आणि त्याचा सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम’ या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित चर्चासत्र पार पडले. यामध्ये लेखक व चित्रपट दिग्दर्शक श्री.तेज सिसोदिया, सिविक स्टुडिओचे श्री.श्रेय जैन आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे यांनी वैचारिक सहभाग घेतला.

   यावेळी वाढत्या तापमानाची तीव्रता, शहरी भागातील उष्णतेची समस्या, कचरा व्यवस्थापन, हरित उपक्रम आणि नागरिकांच्या सहभागाची गरज यावर चर्चा करण्यात आली. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी शाश्वत जीवनशैली, पर्यावरणपूरक सवयी आणि स्थानिक पातळीवर राबवता येणाऱ्या उपाययोजनांवर विशेष भर देण्याविषयी भाष्य करण्यात आले.

  या कार्यक्रमाला एसआयईएस महाविद्यालय नेरूळ, डी वाय पाटील महाविद्यालय नेरूळ, स्टर्लिंग कॉलेज नेरूळ, बंट्स महाविद्यालय येथील 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपली मते मांडली आणि पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला. मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत आयोजित ‘47°C’ या लघुचित्रपटाचे प्रदर्शन व त्यानंतर उपाययोजनांवरील संवाद हा उपक्रम युवा पिढीमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.

00000

संबंधित पोस्ट

पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे ‘मेट्रो भवन’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

माझी वसुंधरा अभियान 5.0′ मध्ये 10 लक्ष लोकसंख्येपेक्षा मोठ्या शहरांच्या अमृत गटात नवी मुंबई राज्यात व्दितीय**’माझी वसुंधरा अभियान ‘4.0’ आणि ‘5.0′ मध्ये व्दितीय क्रमांकाचे 2 पुरस्कार प्रदान**‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ मध्ये ‘भूमी’ थीमॅटिक स्पेशल कॅटेगरीत सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार*

तुंग, आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याहस्ते उद्‌घाटन- शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मानले प्रशासनाचे आभार

vishwatmaklokswamivarta

जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवाव – जिल्हाधिकारी अशोक काकडे

हजारो कोटींची फसवणूक प्रकरण : टोरेस ज्वेलर्स कंपनीचे अनेक मोठे शोरूम बंद, पोलिसांनी तपास सुरू केला.

vishwatmaklokswamivarta