भाजपा जालना महानगरात “मन की बात” कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पंतप्रधान मोदीजींच्या प्रेरणादायी विचारांनी कार्यकर्त्यांना नवचेतना – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे
जालना, (प्रतिनिधी) – भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आज (ता.२२) सकाळी 11 वाजता “मन की बात” या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. हा भाजपा जालना महानगर जिल्ह्यात प्रत्येक बूथ वर संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे हे त्यांच्या प्रभाग क्र. १ मध्ये बूथ वर आयोजित कार्यक्रमास उपस्थित होते. “पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मार्गदर्शन हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी असून, ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशहिताचे विचार, सामाजिक जाणीवा आणि नवचेतना निर्माण होते. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाच्या नव्या उंची गाठल्या आहेत. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या मंत्रावर चालत केंद्र सरकारने विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याने पार पाडली पाहिजे. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी प्रत्येक बूथ स्तरावर कार्यकर्त्यांनी सक्रिय राहणे आवश्यक आहे. असे त्यांनी सांगितले.
तसेच सदरील कार्यक्रम भाजपा जालना महानगरातील विविध मंडळात आयोजित करण्यात आला त्यामध्ये नवीन जालना मंडळात मंडळ अध्यक्ष सुनील खरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जुना जालना मंडळात मंडळ अध्यक्ष महेश निकम, पूर्व जालना मंडळात अमोल धानुरे व जालना ग्रामीण मंडळात तालुकाध्यक्ष संजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. प्रत्येक नगरसेवकांनी हा कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाला महिला मोर्चा, युवा मोर्चा, व्यापारी आघाडी, अनुसूचित जाती-जमाती मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, इत्यादी आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी “मन की बात” कार्यक्रम ऐकला.