vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिल्लीतील बहु चर्चित मद्य घोटाळा प्रकरणातील आम आदमी पार्टीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सह 23 आरोपीची निर्दोष मुक्तता…

दिल्लीतील बहु चर्चित मद्य घोटाळा प्रकरणातील आम आदमी पार्टीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सह 23 आरोपीची निर्दोष मुक्तता…

नवी दिल्ली प्रतिनिधी-दिल्लीतील बहु चर्चित मद्य घोटाळा प्रकरणातील आम आदमी पार्टीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सह 23 आरोपीची निर्दोष मुक्तता…

दिल्लीतल्या बहुचर्चित मद्य घोटाळ्याच्या आरोपात आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात जावं लागलं होतं. त्यांच्यासोबत मनीष सिसोदिया देखील तुरुंगात होते. अरविंद केजरीवाल यांच्यावर मद्य घोटाळ्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. या घोटाळ्यामुळे ते अडचणीत आले होते आणि हातून त्यांची सत्ताही गेली होती. आता अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून सर्वात मोठा दिलासा मिळाला,

मद्य धोरणाशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता झाली आहे. दिल्लीतील राऊज अ‍ॅव्हेन्यू कोर्टाने हा निर्णय दिला आहे.केजरीवाल यांच्यासोबतच आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचीही सर्व आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे. सीबीआयने या प्रकरणी तपास करून आरोपपत्र दाखल केलं होतं.

लाईव्ह लॉ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाने सीबीआयच्या तपासातील त्रुटींवर कठोर ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाने म्हटलं आहे की, हजार पानांच्या या आरोपपत्रात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अनेक साक्षीदारांच्या जबाबाची पुष्टी करत नाहीत.विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी म्हटलं की, चार्जशीटमध्ये केलेले अनेक दावे वस्तुस्थितीला धरून नाहीत.

न्यायालयाने म्हटलं की, सिसोदिया यांच्याविरोधात प्राथमिकदृष्ट्या आरोप सिद्ध होतील, असे पुरावे देण्यात सीबीआय अपयशी ठरली आहे. न्यायाधीशांनी असंही म्हटलं की, केजरीवाल यांना कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय या प्रकरणात गोवण्यात आलं आहे.

राऊज अव्हेन्यू कोर्टाने दोन्ही नेत्यांसह या प्रकरणातील 23 आरोपींनाही मुक्त केलं आहे.

संबंधित पोस्ट

उन्हाळी सुट्टीतही जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थांना मिळणार अध्ययनाचे धडे..

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधानांच्या शुभहस्ते २० जूनला ‘पी.एम. किसान’च्या २३ व्या हप्त्याचे वितरण देशभरात साजरा होणार ‘किसान उत्सव दिवस’

दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी १५ हजारांचे अर्थसहाय्य; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी अंनिसच्या जिल्हा अध्यक्षपदी तानू आंबेकर तर कार्याध्यक्षपदी नंदलाल शिंदे यांची निवड..

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती बैठक जलजिवन मिशन कामांची तालुकानिहाय पाहणी करा-खा.भुमरे

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित ; राज्याचे दरडोई उत्पन्न ३.४७ लाखांवर’ ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2025-26’ सादर • देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा• देशातील थेट परकीय गुंतवणुकीत ३१ टक्के वाट्यासह राज्य अग्रस्थानी• स्टार्टअप्सच्या संख्येतही राज्याचा देशात सर्वाधिक १७ टक्के ,नवीकरणीय ऊर्जेची क्षमता वाढत असून राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर• ६३.८५ लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी त्यातून २.५२ कोटींहून अधिक रोजगार निर्माण*