vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर अभियानातंर्गत बैठकअधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्ह्यात 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर अभियानातंर्गत बैठकअधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्ह्यात 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान

 

जालना, प्रतिनिधी):- जालना जिल्ह्यात दि.7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. ही शिबिरे हे प्रत्येक तालुक्यातील महसूल मंडळ, नगर परिषद व नगर पंचायतीस्तरावर घेतली जाणार आहेत. तरी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामे करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर अभियान टप्पा-1 अंतर्गत व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मनिषा देशपांडे, सहायक जिल्हाधिकारी बी.सर्वनन यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान (टप्पा-1) अंतर्गत समाधान शिबिरांच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी नुकताच घेतला आहे. या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामे आणि नागरिकांच्या तक्रारी एकाच ठिकाणी निकाली काढणे हे आहे. तरी अधिकाधिक नागरिकांना शिबिराचा लाभ घेता यावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराची जनजागृती सर्व माध्यामाद्वारे करण्यात यावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराचे सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

समाधान शिबिरात भोगवटदार वर्ग-2 ते वर्ग-1 परावर्तन पुर्ण करुन सातबारा अद्ययावत देणे, जीवंत सातबारा अंतर्गत प्रलंबित नोंदी दुरुस्त करणे, सामाजिक योजनांचे अर्ज मंजूर करुन शिबिरात वितरण करणे, पाणंद रस्ते व सर्वांसाठी घरे प्रकरणे निकाली काढुन आदेश/पट्टे वाटप करणे, प्रलंबित व ‍विवादग्रस्त फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क सुरु करणे, अकृषिक सुधारणाकरणेबाबत मार्गदर्शन करणे, लोकसेवा हक्क कायद्यानुसार प्रमाणपत्र अर्ज स्विकारणे व वितरण करणे, डिजीटल सातबारा, व नवीन महसूल तरतुदींची जनजागृती करणे, कमी जास्त पत्रके अद्ययावत करणे, एक खिडकी सुविधेद्वारे ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक, पीएम किसान व तक्रार निवारण सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. अशी माहिती ही यावेळी देण्यात आली. या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे उपस्थित होते.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव

vishwatmaklokswamivarta

दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांन शोधून काढेल आणि शिक्षा करेल. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा ही होणारच. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

विभागाने द्वारपोच चिकित्सा सेवा द्यावी-मंत्री पंकजा मुंडे *गोशाळा नोंदणीचे प्रमाणपत्र वाटप

कायद्याचा धाक, प्रबोधनामुळे अमली पदार्थसंबंधी गुन्ह्यांना आळा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ टास्क फोर्सच्या सातव्या बैठकीत घेतला आढावा..

अंबादास दानवे यांनी आमदार पदी निवड झाल्याबद्दल बदनापूर शिवसेनेच्या वतीने सत्कार

पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यास ऑपरेशन सिंदूर मोहिमेतून चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ सातारा जिल्ह्यात जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर तिरंगा रॅलीचे 20 मे रोजी आयोजन