vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात ‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

जिल्ह्यात ‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी — नागरिकांची सुरक्षितता, पक्षी-प्राण्यांचे संरक्षण आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी जिल्ह्यात नायलॉन, प्लास्टिक किंवा सिंथेटिक मटेरियलपासून बनवलेल्या कृत्रिम पतंग उडवण्याच्या धाग्यावर म्हणजे ‘चायनीज मांजा’वर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत जारी केला आहे.

काच किंवा धातूच्या धुळीने लेपित केलेला चायनीज मांजा वापरल्यामुळे दुचाकीस्वारांसह अनेक नागरिकांना गंभीर दुखापती होण्याचा तसेच मृत्यूचे प्रकार घडले आहेत. याशिवाय या धाग्यामुळे पक्षी आणि प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात इजा होते. हा धागा जैविकदृष्ट्या विघटनशील नसल्याने पर्यावरणालाही मोठी हानी पोहोचते.

भारत सरकारने पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ अंतर्गत कृत्रिम मांजाचे उत्पादन, विक्री आणि वापर यावर आधीच बंदी घातली आहे. विविध उच्च न्यायालयांनीही या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्रात नायलॉन, प्लास्टिक किंवा सिंथेटिक मटेरियलपासून बनवलेल्या कोणत्याही कृत्रिम पतंग उडवण्याच्या धाग्याचे उत्पादन, विक्री, साठवणूक, पुरवठा तसेच वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असून संबंधित साहित्य जप्त केले जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.हा आदेश २८ फेब्रुवारी रोजी जारी झाल्यापासून पुढील दोन महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहणार असून आवश्यक असल्यास तो पुढेही वाढविण्यात येऊ शकतो. हा आदेश सर्वसामान्यांच्या माहितीसाठी सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध करण्यात आला आहे.

००००

संबंधित पोस्ट

महिलांना सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पत्रकार यांनी एकत्रपणे काम महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे

विजेच्या स्मार्ट पोस्टपेड मीटरच्या माध्यमातूनसौर तासामध्ये वीज वापरावर बिलात १० टक्के सवलत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यातील कामे येत्या सप्टेंबर अखेर सुरु- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

पहलगाम  दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले. या कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी ‘तिरंगा रॅली’ आयोजन

vishwatmaklokswamivarta

भागवत हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ-राहुल महाराज जोशी हभप दिनेश महाराज उंडे यांचे आज हरिकिर्तन

vishwatmaklokswamivarta

आरक्षण सोडत – हरकती व सूचना 17 ऑक्टोबरपर्यंत स्वीकारणार- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta