vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भक्त आणि साईबाबा यांच्यातील साईबाबा संस्थान हे दुवा – अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी

भक्त आणि साईबाबा यांच्यातील साईबाबा संस्थान हे दुवा – अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी

 

शिर्डी, प्रतिनिधी – श्री साईबाबा संस्थान

विश्वस्त व्यवस्था यांच्यावतीने राबविण्यात येत असलेले उपक्रम म्हणजे येथे येणाऱ्या साईबाबा भक्तांसाठी प्रसाद आहे. भाविक आणि साईबाबा यांच्यातील दुवा म्हणून संस्थान काम करते, असे गौरवोद्गार राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी काढले.

शिर्डी येथे राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीची बैठक आजपासून सुरू झाली. यावेळी समिती सदस्यांनी श्री साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर संस्थांनच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी समिती अध्यक्ष आणि सदस्यांचे स्वागत केले. याप्रसंगी माहिती संचालक डॉ. गणेश मुळे, राज्य समिती सदस्य नवनाथ दिघे, प्रकाश कुलथे, नाशिक विभागीय समितीचे अध्यक्ष सुधीर लंके तसेच राज्य समितीचे सदस्य उपस्थित होते.यावेळी समितीचे अध्यक्ष श्री. जोशी म्हणाले, श्री साईबाबा तसेच शेगाव आणि इतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अतिशय आस्था आणि भक्तिभावनेने भाविक येतात. विज्ञान कितीही प्रगत झाले तरी समाजातील नैतिकता टिकविण्यासाठी त्याला अध्यात्मची जोड असणे आवश्यक आहे. त्यामुळेच श्री साईबाबा समाधी मंदिर आणि इतर तीर्थक्षेत्रे नैतिकतेचे प्रभावी व्यासपीठ आहेत. त्याठिकाणी येण्याचे भाग्य लाभले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

माहिती संचालक डॉ. मुळे म्हणाले की, संस्थांनचे उपक्रम हे निश्चितपणे सामान्य माणसाला आत्मविश्वास देणारे आहेत.

यावेळी संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गाडीलकर यांनी संस्थान राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सेवा उपक्रमांच्या माध्यमातून भक्तांची आरोग्य, शिक्षणासाठी मदत, रोजगारनिर्मितीला चालना असे बहुपयोगी उपक्रम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केलेयावेळी सर्व सदस्यांचा श्री साईबाबा मूर्ती आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.

.***

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश! बिजापूरच्या नेशनल पार्क जंगलात झालेल्या चकमकीत 1 कोटींचं बक्षीस असलेला नक्षल कमांडर सुधाकर ठार.

रासायनिक दुर्घटनेचे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक; ३०० जणांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने जीवितहानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मृतांना श्रद्धांजली तर नातेवाईकांना रु. ५ लाख अर्थसहाय्याची घोषणा

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्र्यांनी घेतला विविध विभागांचा आढावा

महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये,लवकरात लवकर लागू करावेत कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी गुन्हे नोंदवले जाणे आवश्यक,एफआयआर दाखल करण्यात विलंब होता कामा नये सात वर्षांहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त दोषसिद्धी दर मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

vishwatmaklokswamivarta